राष्ट्रीय

राम मंदिराच्या उद‌्घाटनाला एकाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लोकांना निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Swapnil S

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम २२ जानेवारीला होणार आहे. त्याची देशभर जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने देशभरातून भाविक उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निमंत्रण देण्याचे टाळण्यात आले आहे.
रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येला पोहोचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन करणे शक्य होणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव देशभरातील राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम उत्तर प्रदेशात होत असल्याने केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होतील.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लोकांना निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण ७ हजार लोकांना निमंत्रण पाठवले जाणार असून त्यापैकी ३ हजार व्हीव्हीआयपी असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह ३ हजार व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या यादीत क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अभिनेता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कंगना रणावत यांचीही नावे आहेत. याशिवाय देशभरातून ४ हजार संतांना पाचारण करण्यात आले आहे.

ॲक्वा लाईन मेट्रोमुळे बेस्टचे प्रवासी घटले! प्रवाशांना बेस्टकडे वळवण्यासाठी अधिक गाड्या सोडण्याच्या विचारात प्रशासन

रुपाली चाकणकरांविरोधात वंचितचा मोर्चा; पोलिसांकडून मारहाण, वंचित बहुजन आघाडीच्या महिलांचा गंभीर आरोप

मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण नाहीच; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे तासभर ठप्प; ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल

पार्थमुळे अजितदादा अडचणीत! पुण्यातील जमीन घोटाळा भोवणार; १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी केल्याचा आरोप