राष्ट्रीय

मोदींना तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यास ईशान्य भारत एकत्र येईल

- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांचा विश्वास

नवशक्ती Web Desk

गुवाहाटी : मणिपूरमध्ये हिंसाचार झाला असला तरी नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यासाठी ईशान्य बारतातील जनता एकत्र येईल, असा विश्वास आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सर्मा यांनी व्यक्त केला.

सर्मा यांनी बुधवारी गुवाहटी येथे भाजपच्या विस्तारकांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, मणिपूरमध्ये हिंसाचार झाला असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत विजय मिळवेल. भाजपच्या शासनकाळात ईशान्य भारतात बरीच विकासकामे झाली आहेत. सिल्चर-जिरिबाम रस्ता झाला नसता तर आज राज्यात इंधनाचे भाव प्रति लिटर १००० रुपयांच्या पुढे गेले असते. त्यामुळे ईशान्य भारतातील जनता भाजपला विजयी करून देईल.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत