राष्ट्रीय

एक देश, एक निवडणूक २०२९ नंतरच विधी आयोगाच्या सूत्राची माहिती

निवडणुकांच्या पद्धतीवर सध्या विचारविनिमय केला जात आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : देशात पंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याचे सूत्र तयार करण्याचे काम केंद्रीय विधी आयोग सध्या वेगाने करीत आहे. मात्र, या सूत्रानुसार एक देश, एक निवडणूक पद्धत २०२९ पासूनच सुरू होणे शक्य आहे, असे सूत्रांकडून शुक्रवारी समजले आहे.

केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्यासाठी एक उच्चस्तरीय लॉ पॅनेलची आधीच स्थापन केली आहे. विधी आयोगाला या निवडणुकांसोबत पंचायती आणि नगरपालिका निवडणुका देखील घेण्याची सूचना केली जाऊ शकते. देशात निवडणुकांसाठी होणारा खर्च, वेळ आणि मनुष्यबळाचा वापर कमी करण्यासाठी एकत्रित निवडणुका व्हाव्यात, यासाठी लॉ पॅनेल एखादी यंत्रणा उभारण्याचा विचार करीत आहे. सध्या हे काम निवडणूक आयोगाकडून केले जाते. लॉ कमिशनचा याबाबतचा अहवाल अजून तयार झालेला नाही, कारण काही मुद्दे अजूनही निकालात काढणे बाकी आहे.

एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यासाठी विधानसभांची मुदत घटवावी किंवा वाढवावी, अशी शिफारस लॉ कमिशनकडून होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची यंत्रणा सुरू झाल्यानंतर मतदाता केवळ एकदाच मतदानास जार्इल, याची तजवीज करावी लागणार आहे. यामुळे या निवडणुकांच्या पद्धतीवर सध्या विचारविनिमय केला जात आहे. एप्रिल २०१८ मध्ये विधी मंत्रालयाने लॉ कमिशनला एकत्रित निवडणुकांची चाचपणी करण्यास सांगितले होते.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून