नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा पराभव करण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाचा पुनरुच्चार केला आहे. या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल फोटो बदलून 'ऑपरेशन सिंदूर'चा लोगो ठेवला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलांनी या मोहिमेदरम्यान अतुलनीय धैर्य, अचूकता आणि दृढ निर्धार यांचे दर्शन घडवले. हे भारताचे दहशतवादाविरुद्धचे खंबीर धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रती असलेली अतूट बांधिलकी दर्शवते
गेल्या वर्षी ७ मे च्या पहाटे, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते. २२ एप्रिल रोजी पहलगाम इथे झालेल्या त्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेला होता. त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारताने अचूक हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले होते.