राष्ट्रीय

सुरुवातीच्या काळात चुकीच्या वाटणाऱ्या योजना भविष्यात उपयुक्त ठरतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘अग्निपथ’ योजनेबाबत अनेक संघटनांकडून जोरदार आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधानांचे हे वक्तव्य लक्षणीय आहे

वृत्तसंस्था

काही योजना प्रारंभीच्या काळात चुकीच्या वाटू शकतात; पण भविष्यात त्या राष्ट्र निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अग्निपथ’बाबत थेट मत व्यक्त केले नाही. देशात ‘अग्निपथ’ योजनेबाबत अनेक संघटनांकडून जोरदार आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधानांचे हे वक्तव्य लक्षणीय आहे. भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात २८० कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या ‘मेंदू संशोधन केंद्रा’चे उद‌्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते.

बंगळुरू येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, सुधारणांचा रस्ता आपल्याला नवीन लक्ष्य व नवीन संकल्पाच्या पुढे घेऊन जाऊ शकतो. या योजनेचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. त्याचे उद‌्घाटन माझ्या हस्ते होत आहे ही बाब सुखद आहे. या केंद्रात मेंदू व्यवस्थापनाबाबत मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘मेंदू संशोधन केंद्रा’ला खास संशोधन केंद्र म्हणून विकसित केले असून वयानुसार मेंदू विकारावर संशोधन केले जाईल.

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या लोकल ट्रेन्सची खास 'हॉर्न सलामी'; रात्री १२ चा ठोका वाजताच CSMT वर जल्लोष; Video व्हायरल

साताऱ्यात ३३ वर्षांनंतर साहित्यिकांचा भव्य मेळा; ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

चांदी जैसा रंग, सोने जैसा भाव...; मूल्य, परताव्याबाबत २०२५ मध्ये चांदीच ठरली सरस

न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा; निवडणुकीच्या कामाला स्थगिती; BMC आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर HC ची नाराजी

नवी मुंबईतील मतदार करणार ३ ते ४ वेळा मतदान; बहुसदस्यीय पद्धतीने प्रथमच निवडणूक; व्यापक जनजागृतीची गरज