राष्ट्रीय

सुरुवातीच्या काळात चुकीच्या वाटणाऱ्या योजना भविष्यात उपयुक्त ठरतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘अग्निपथ’ योजनेबाबत अनेक संघटनांकडून जोरदार आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधानांचे हे वक्तव्य लक्षणीय आहे

वृत्तसंस्था

काही योजना प्रारंभीच्या काळात चुकीच्या वाटू शकतात; पण भविष्यात त्या राष्ट्र निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अग्निपथ’बाबत थेट मत व्यक्त केले नाही. देशात ‘अग्निपथ’ योजनेबाबत अनेक संघटनांकडून जोरदार आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधानांचे हे वक्तव्य लक्षणीय आहे. भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात २८० कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या ‘मेंदू संशोधन केंद्रा’चे उद‌्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते.

बंगळुरू येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, सुधारणांचा रस्ता आपल्याला नवीन लक्ष्य व नवीन संकल्पाच्या पुढे घेऊन जाऊ शकतो. या योजनेचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. त्याचे उद‌्घाटन माझ्या हस्ते होत आहे ही बाब सुखद आहे. या केंद्रात मेंदू व्यवस्थापनाबाबत मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘मेंदू संशोधन केंद्रा’ला खास संशोधन केंद्र म्हणून विकसित केले असून वयानुसार मेंदू विकारावर संशोधन केले जाईल.

Satyacha Morcha Mumbai : काढ रे तो पडदा! राज ठाकरे थेट पुरावा घेऊनच आले; म्हणाले, "त्यांना आधी बडवायचं मग...

Satyacha Morcha Mumbai : उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन; म्हणाले, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला...

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटले? रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या

मुंबईत राजकीय रणकंदन; विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचे 'मूक आंदोलन' करून प्रत्युत्तर

Andhra Pradesh : एकादशीला भाविकांवर काळाचा घाला; वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी