राष्ट्रीय

"गेल्या ६० वर्षात काँग्रेसने..." ; एकीकडे विरोधकांचा गोंधळ तर दुसरीकडे मोदींची काँग्रेसवर टीका

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केले आणि काँग्रेसवर टीकाही केली, काँग्रेसनेही संसदेत मोठा गदारोळ केला.

प्रतिनिधी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर तोफ डागली. ते म्हणाले, "काँग्रेसने गेल्या ६ दशकात भारताचे वाटोळे केले. देशातल्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी विरोधकांनी मात्र त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर ताशेरे ओढणे चालूच ठेवले. यावेळी विरोधक खासदारांनी राज्यसभेत 'मोदी-अदानी भाई भाई' अशा घोषणा देत पंतप्रधान मोदींच्या भाषणामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "गेल्या ९ वर्षांमध्ये आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शिधान्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अडचणींपासून दूर पाळणारे नाही, तर त्यावर उपाय शोधणारे आहोत." असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, "देशामध्ये कमळ फुलण्यामध्ये मोठे योगदान हे विरोधकांचेच आहे. कारण, जेवढा चिखल तुम्ही आमच्यावर फेकाल, तेवढेच कमळ चांगले फुलेल." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

गौरी गर्जे प्रकरणात मोठा ट्विस्ट; दोघांच्या अंगावर जखमा, अनंत गर्जेच्या पोलिस कोठडीत वाढ

६ महिन्यांचा संसार, कौमार्य चाचणी अन् पतीचे अफेअर; नाशिकमध्ये विवाहितेने संपवलं जीवन

Disha Salian's Death Case : पाच वर्ष उलटले तरी किती वेळ चौकशी करणार? हायकोर्टाने पोलिसांना फटकारले

कोकणात राणे बंधू वाद टोकाला; निलेश राणेंच्या स्टींग ऑपरेशनवर नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "हमाम में तो सब...

मुंबई, पुण्यासाठी खूशखबर! बदलापूर ते कर्जत तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला मंजुरी; पुणे मेट्रोच्या 'फेज २'चा विस्तार होणार