राष्ट्रीय

"गेल्या ६० वर्षात काँग्रेसने..." ; एकीकडे विरोधकांचा गोंधळ तर दुसरीकडे मोदींची काँग्रेसवर टीका

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केले आणि काँग्रेसवर टीकाही केली, काँग्रेसनेही संसदेत मोठा गदारोळ केला.

प्रतिनिधी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर तोफ डागली. ते म्हणाले, "काँग्रेसने गेल्या ६ दशकात भारताचे वाटोळे केले. देशातल्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी विरोधकांनी मात्र त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर ताशेरे ओढणे चालूच ठेवले. यावेळी विरोधक खासदारांनी राज्यसभेत 'मोदी-अदानी भाई भाई' अशा घोषणा देत पंतप्रधान मोदींच्या भाषणामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "गेल्या ९ वर्षांमध्ये आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शिधान्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अडचणींपासून दूर पाळणारे नाही, तर त्यावर उपाय शोधणारे आहोत." असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, "देशामध्ये कमळ फुलण्यामध्ये मोठे योगदान हे विरोधकांचेच आहे. कारण, जेवढा चिखल तुम्ही आमच्यावर फेकाल, तेवढेच कमळ चांगले फुलेल." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती