राष्ट्रीय

"गेल्या ६० वर्षात काँग्रेसने..." ; एकीकडे विरोधकांचा गोंधळ तर दुसरीकडे मोदींची काँग्रेसवर टीका

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केले आणि काँग्रेसवर टीकाही केली, काँग्रेसनेही संसदेत मोठा गदारोळ केला.

प्रतिनिधी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर तोफ डागली. ते म्हणाले, "काँग्रेसने गेल्या ६ दशकात भारताचे वाटोळे केले. देशातल्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी विरोधकांनी मात्र त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर ताशेरे ओढणे चालूच ठेवले. यावेळी विरोधक खासदारांनी राज्यसभेत 'मोदी-अदानी भाई भाई' अशा घोषणा देत पंतप्रधान मोदींच्या भाषणामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "गेल्या ९ वर्षांमध्ये आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शिधान्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अडचणींपासून दूर पाळणारे नाही, तर त्यावर उपाय शोधणारे आहोत." असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, "देशामध्ये कमळ फुलण्यामध्ये मोठे योगदान हे विरोधकांचेच आहे. कारण, जेवढा चिखल तुम्ही आमच्यावर फेकाल, तेवढेच कमळ चांगले फुलेल." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

MSRTC Chhava Ride : एकाच ॲपवर मिळणार एसटी, ऑटो, टॅक्सीची सुविधा! 'छावा राईड' लाँचच्या दिशेने मोठं पाऊल; जाणून घ्या सविस्तर

"सुरुवातीपासूनच सरकार आणि यंत्रणा त्यांना वाचवत होती"; बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

चितेजवळ मृतदेह तसाच सोडून नातेवाईक जीव मुठीत घेऊन पळाले; अंत्यविधीदरम्यान नेमकं काय घडलं? पुण्यातील Video व्हायरल

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' तारखेपूर्वी पूर्ण करा e-KYC; घरबसल्या कशी कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया