राष्ट्रीय

दिल्लीत प्रदूषण धोकादायक पातळीवर; एक्यूआय ५०० च्या वर

दिल्लीत प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. मंगळवारी दिल्लीतील अनेक भागात हवा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) ५०० च्यावर नोंदला गेला, तर दिल्लीचा सरासरी ‘एक्यूआय’ ४९४ वर पोहोचला.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीत प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. मंगळवारी दिल्लीतील अनेक भागात हवा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) ५०० च्यावर नोंदला गेला, तर दिल्लीचा सरासरी ‘एक्यूआय’ ४९४ वर पोहोचला.

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने आपल्या कर्मचाऱ्यांना मास्क सक्तीचा केला आहे. शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा केंद्र व दिल्ली सरकारला कठोर उपाययोजना करण्यास बजावले आहे.

दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी केली आहे. राय यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना सांगितले की, दिल्लीत प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या समस्येतून सोडवणूक करण्यासाठी कृत्रिम पाऊस गरजेचा आहे.

प्रदूषणामुळे अपघात

नोएडात प्रदूषण व धुक्यामुळे ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस-वेवर मंगळवारी सकाळी अनेक अपघात झाले. दृश्यमानता कमी झाल्याने एक ट्रक दुभाजकावर चढला. या ट्रकच्या मागे येत असलेली चार एसयूव्ही वाहने व काही दुचाकी एकमेकांवर आदळल्या. या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले.

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध; राजकारणी ते बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती

IND vd ENG ICC T20 WC26 : वानखेडेवर आज अहमदाबादचे तिकीट? इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे ध्येय

पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी

मिठी नदी गाळ घोटाळा : EOW कडून दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल