राष्ट्रीय

दिल्लीत प्रदूषण धोकादायक पातळीवर; एक्यूआय ५०० च्या वर

दिल्लीत प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. मंगळवारी दिल्लीतील अनेक भागात हवा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) ५०० च्यावर नोंदला गेला, तर दिल्लीचा सरासरी ‘एक्यूआय’ ४९४ वर पोहोचला.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीत प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. मंगळवारी दिल्लीतील अनेक भागात हवा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) ५०० च्यावर नोंदला गेला, तर दिल्लीचा सरासरी ‘एक्यूआय’ ४९४ वर पोहोचला.

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने आपल्या कर्मचाऱ्यांना मास्क सक्तीचा केला आहे. शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा केंद्र व दिल्ली सरकारला कठोर उपाययोजना करण्यास बजावले आहे.

दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी केली आहे. राय यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना सांगितले की, दिल्लीत प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या समस्येतून सोडवणूक करण्यासाठी कृत्रिम पाऊस गरजेचा आहे.

प्रदूषणामुळे अपघात

नोएडात प्रदूषण व धुक्यामुळे ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस-वेवर मंगळवारी सकाळी अनेक अपघात झाले. दृश्यमानता कमी झाल्याने एक ट्रक दुभाजकावर चढला. या ट्रकच्या मागे येत असलेली चार एसयूव्ही वाहने व काही दुचाकी एकमेकांवर आदळल्या. या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले.

'वर्ककेशन'मध्ये मुंबईचा ग्लोबल डंका; 'वर्क फ्रॉम एनिवेअर'मुळे उत्पादकतेत ८० टक्के वाढ; कामासोबत पर्यटनासाठी मुंबईला जागतिक पसंती

Pune : दोन महिला पोलिस करणार होत्या समलैंगिक विवाह; आळंदीत लग्नाची तयारी, पत्रिकाही छापल्या, पण आता विवाह रद्द

माहुलमध्ये तीन मजली अत्याधुनिक अग्निशमन केंद्र; आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळणार; अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था

केशव सृष्टी सहल वादाच्या भोवऱ्यात! सपानंतर काँग्रेसचाही विरोध

तुर्भेमधील गोदामातील जप्ती हायकोर्टाने ठरवली बेकायदेशीर; नवी मुंबई पोलिसांना झटका