राष्ट्रीय

प्रयागराज कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमदला जन्मठेप

गेले काही दिवस चर्चेत असलेल्या उमेश पाल अपहरण प्रकरणात आता प्रयागराजच्या स्पेशल एमपी-एमएलए न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला

प्रतिनिधी

आज उमेश पाल अपहरण प्रकरणात प्रयागराजच्या स्पेशल एमपी-एमएलए न्यायाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. १७ वर्षे जुने असलेल्या या प्रकरणात न्यायालयाने अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याला ५,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात न्यायालयाने अतिक अहमदसह ३ आरोपींना दोषी ठरवले, तसेच ७ आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आले आहे.

२८ फेब्रुवारी २००६ रोजी बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेले उमेश पाल यांचे अपहरण केल्याचा आरोप अतिक अहमद आणि अशरफ यांच्यावर आहे. उमेश पाल यांना मारहाण केल्यानंतर कुटुंबासह त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, न्यायालयात बळजबरीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.

२००७मध्ये मायावतींचे सरकार स्थापन झाल्यानंतर ५ जुलै २००७ला उमेश पाल यांनी अतिक आणि अशरफ यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर झालेल्या पोलीस तपासात आणखी ६ जणांची नवे समोर आली. यासंदर्भात आज अतिक अहमद, सौलत हनिफ आणि दिनेश पासी यांना न्यायालयाने दोषी ठरवले. तर अशरफसह ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली