राष्ट्रीय

राजस्थानमध्ये भीषण अपघात; ७ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील दौसा येथे खाटूश्यामजींचे दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपची कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ लहान मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे.

Swapnil S

जयपूर : राजस्थानमधील दौसा येथे खाटूश्यामजींचे दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपची कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ लहान मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पूर्वी (३), प्रियंका (२५), दक्ष (५), शीला, अंशु (२६), सीमा (२३), नैतीक (८), प्रियंका, रीता (२६), लक्ष्य (७), नीरज (२०) यांचा समावेश आहे. हा अपघात रात्री ३.३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान झाला असून सर्व मृत उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

बैसई पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला. यामध्ये प्रवाशांनी भरलेली गाडी उभ्या ट्रकला जाऊन धडकली.

Mumbai : दहिसर टोलनाका स्थलांतरित होणार; वेस्टर्न हॉटेलच्या पुढे हलविण्याचे आदेश

ठाणे : कसं दिसतं नवीन गडकरी रंगायतन? उद्या होणार लोकार्पण, बघा फोटो

कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी कायम; तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन - हायकोर्ट

मुंबईकरांना स्वातंत्र्यदिनाचं गिफ्ट! उद्यापासून कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; विहार क्षेत्र, भुयारी मार्गाचं आज लोकार्पण

भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाचा पुनर्विचार करू! सरन्यायाधीशांनी दिली लक्ष घालण्याची हमी