राष्ट्रीय

राजस्थानमध्ये भीषण अपघात; ७ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील दौसा येथे खाटूश्यामजींचे दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपची कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ लहान मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे.

Swapnil S

जयपूर : राजस्थानमधील दौसा येथे खाटूश्यामजींचे दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपची कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ लहान मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पूर्वी (३), प्रियंका (२५), दक्ष (५), शीला, अंशु (२६), सीमा (२३), नैतीक (८), प्रियंका, रीता (२६), लक्ष्य (७), नीरज (२०) यांचा समावेश आहे. हा अपघात रात्री ३.३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान झाला असून सर्व मृत उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

बैसई पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला. यामध्ये प्रवाशांनी भरलेली गाडी उभ्या ट्रकला जाऊन धडकली.

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार