राष्ट्रीय

राजस्थानमध्ये भीषण अपघात; ७ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील दौसा येथे खाटूश्यामजींचे दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपची कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ लहान मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे.

Swapnil S

जयपूर : राजस्थानमधील दौसा येथे खाटूश्यामजींचे दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपची कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ लहान मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पूर्वी (३), प्रियंका (२५), दक्ष (५), शीला, अंशु (२६), सीमा (२३), नैतीक (८), प्रियंका, रीता (२६), लक्ष्य (७), नीरज (२०) यांचा समावेश आहे. हा अपघात रात्री ३.३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान झाला असून सर्व मृत उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

बैसई पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला. यामध्ये प्रवाशांनी भरलेली गाडी उभ्या ट्रकला जाऊन धडकली.

महावितरण कंपनीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब; शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी महावितरणचा IPO येणार

आता राज्यभरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास चार वर्षांचा होणार; विद्यापीठांमध्ये २०२६-२७ पासून 'ऑनर्स' आणि 'संशोधन' पदवीचे नवे पर्याय उपलब्ध

Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

उरण : आदिवासी वाड्यांची पाण्यासाठी वणवण; रानसई-पुनाडे धरणात अवघा ४७% साठा

आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार