राष्ट्रीय

राजस्थानमध्ये भीषण अपघात; ७ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील दौसा येथे खाटूश्यामजींचे दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपची कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ लहान मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे.

Swapnil S

जयपूर : राजस्थानमधील दौसा येथे खाटूश्यामजींचे दर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपची कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ लहान मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पूर्वी (३), प्रियंका (२५), दक्ष (५), शीला, अंशु (२६), सीमा (२३), नैतीक (८), प्रियंका, रीता (२६), लक्ष्य (७), नीरज (२०) यांचा समावेश आहे. हा अपघात रात्री ३.३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान झाला असून सर्व मृत उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

बैसई पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला. यामध्ये प्रवाशांनी भरलेली गाडी उभ्या ट्रकला जाऊन धडकली.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी