@ANI
राष्ट्रीय

काँग्रेसने काय केले त्याऐवजी बीआरएसने ेकाय केले ते राव यांनी जनतेला सांगावे - राहुल गांधी

नवशक्ती Web Desk

आंदोळे (तेलंगणा) : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसला सवाल करण्याऐवजी लोकांना त्यांनी काम काय केले आहे, ते सांगावे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना सांगितले.

के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस सरकारने आपल्या कामांचा लेखाजोखा लोकांपुढे माडावा, वास्तविक हे सरकार देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला.

ते म्हणाले की, कॉंग्रेसने दिलेल्या ‘सहा हमी’ पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच कायद्यात बसवून तयार केल्या जातील, जर पक्ष राज्यात सत्तेवर आला आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल.

आज तेलंगणात दोराला सरकार (सामंत सरकार) आणि प्रजला सरकार (लोकांचे सरकार) यांच्यात लढत आहे. काँग्रेसने काय केले असे तुमचे मुख्यमंत्री विचारत आहेत. काँग्रेसने काय केले हा प्रश्न नाही, तर केसीआरने काय केले, हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, तेलंगणातील बीआरएस आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पराभव करणे हे लक्ष्य आहे. राव ज्या हैदराबाद शहरातून कोट्यवधी रुपयांची लूट करत आहेत, ते काँग्रेसने विकसित केले आणि त्याचे आयटी हबमध्ये रूपांतर केले, असेही गांधी म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त