राष्ट्रीय

रिलायन्सने गाठला माईलस्टोन! 'हा' टप्पा गाठणारी देशातील पहिली कंपनी

दुसऱ्या स्थानावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) असून त्यांचे बाजारमूल्य १५.०७ लाख कोटी रुपये आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजारमूल्य २० लाख कोटी रुपयांहून अधिक गेले आहे. मंगळवारी कंपनीच्या समभागांनी २९५८ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य २० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. हा टप्पा गाठणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे.

यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीने १५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये रिलायन्सचे बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) असून त्यांचे बाजारमूल्य १५.०७ लाख कोटी रुपये आहे. या यादीत १०.५६ लाख कोटींसह एचडीएफसी बँक तिसऱ्या स्थानावर आहे, तर आयसीआयसीआय बँक ६.९८ लाख कोटी आणि इन्फोसिस ६.९७ लाख कोटींसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

Mumbai : मनोरी प्रकल्पाला CRZ ची मंजुरी; समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाला गती

सिडकोच्या ताब्यातील स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार; २० वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय, नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना दिलासा

राज्यात बोगस दातांच्या डॉक्टरांना बसणार आळा; महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारी

Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित

Thane : प्रक्रिया केलेले पाणी महापालिका विकणार; पाणीटंचाईसह अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटासाठी पालिका सज्ज