राष्ट्रीय

रिलायन्सने गाठला माईलस्टोन! 'हा' टप्पा गाठणारी देशातील पहिली कंपनी

दुसऱ्या स्थानावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) असून त्यांचे बाजारमूल्य १५.०७ लाख कोटी रुपये आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजारमूल्य २० लाख कोटी रुपयांहून अधिक गेले आहे. मंगळवारी कंपनीच्या समभागांनी २९५८ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य २० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. हा टप्पा गाठणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे.

यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीने १५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये रिलायन्सचे बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) असून त्यांचे बाजारमूल्य १५.०७ लाख कोटी रुपये आहे. या यादीत १०.५६ लाख कोटींसह एचडीएफसी बँक तिसऱ्या स्थानावर आहे, तर आयसीआयसीआय बँक ६.९८ लाख कोटी आणि इन्फोसिस ६.९७ लाख कोटींसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

झोपडपट्टीमुक्त मुंबई...'एकात्मिक विकासा'साठी १७ प्रकल्पांची निवड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

आजचे राशिभविष्य, १४ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

"त्यांच्या काही शंका असतील तर..."; राज ठाकरेंच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंचा मोठा निर्णय; e-KYC मध्ये चूक झाली असेल तर...

Lionel Messi's India Tour 2025: पुतळ्याचे अनावरण, स्टेडियममध्ये राडा; कोलकात्यानंतर मेस्सी कुठे अन् कोणाला भेटणार? जाणून घ्या मेस्सीचा संपूर्ण भारत दौरा