राष्ट्रीय

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार; करमुसे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

प्रतिनिधी

२ वर्षांपूर्वीच्या अनंत करमुसे (Anant Karmuse) मारहाण प्रकरणामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. कारण, पुन्हा या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता या मारहाणीप्रकरणी जितेंद्र आव्हाड चांगलेच गोत्यात सापडण्याची शक्यता आहे.

अभियंता अनंत करमुसे प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुढील तपास करण्याचे आदेश देण्यात आले असून याचा अहवाल ३ महिन्यात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी अनंत करसेंना मारहाण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पुन्हा तपासणी सुरु करावी, अशी मागणी केली होती.

नेमकं प्रकरण काय?

महाविकास आघाडीची सत्ता असताना ५ एप्रिल २०२०मध्ये अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मिडीयावर एक पोस्ट केली होती. यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकासह काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी घेऊन जात मारहाण केल्याची माहिती दिली होती. या प्रकरणी अनंत करमुसे यांचे अपहरण करत मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?

काय सांगता! Bajajनं आणली चक्क CNG BIKE, 'या' दिवशी होणार लॉन्च

"दिलेला शब्द पाळला नाही"; उमेदवारी नाकारल्याने खासदार गावित नाराज