गंगटोक : सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील समरदंग येथे जलविद्युत प्रकल्पातील बोगद्याचे काम सुरू असताना दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला.
अजूनही या बोगद्यात २५ जण अडकले असून त्यात प्रकल्पातील अधिकारी व कामगारांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. एनएचपीसीमार्फत तिस्ता जलविद्युत प्रकल्पांतर्गत (सहावा टप्पा) या बोगद्याचे काम सुरू होते.
मंगळवारी सकाळी साडेनऊपर्यंत या दरडीखालून १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.