राष्ट्रीय

स्नान करताना गंगेत सहा जणांचा बुडून मृत्यू

संदीप कटियार यांनी सुरू केलेल्या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी काही नातेवाईक आले होते

वृत्तसंस्था

कानपूरच्या बिल्हौरमधील अरौल कोठी घाटावर गंगेत स्नान करताना सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यात एक तरुण आणि चार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

अरौल शहरातील बरांडा गावात राहणाऱ्या संदीप कटियार यांनी सुरू केलेल्या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी काही नातेवाईक आले होते. नातेवाईकांसह काही मुले गंगा नदीत अंघोळीसाठी गेली असता ही दुर्घटना घडली. यामध्ये अनुष्का उर्फ ​​दिव्या कुमार, बहीण अंशिका, मुलगा राम सिंह, फारुखाबादमधील रामबाबू, तनुष्का,नुष्का, सृष्टी आणि गौरी यांच्यासह आठ ते १० जण अंघोळीसाठी कोठी घाटावर गेले होते. यावेळी यातील सहा जणांचा बुडून मृत्यू झाला.

अटल पेन्शनचे केंद्रीकरण चिंताजनक; बँकांनी ग्राहकांना पेन्शन स्लॅबसाठी प्रवृत्त करावे - वित्तीय सेवा विभाग सचिव एम. नागराजू

मुंबईकरांसाठी खुशखबर! गोराईत महाराष्ट्रातील पहिल्या मँग्रोव्ह पार्कचं २८ मे रोजी उद्घाटन; पर्यावरण पर्यटनाला मिळणार चालना

Mumbai : वांद्र्यातील गरीब नगर पाडकाम ८५ टक्के पूर्ण; "मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई," पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण

नवी मुंबईत ५०४ इमारती धोकादायक; ५२ इमारती अतिधोकादायक; विभागवार सर्वेक्षणानंतर यादी जाहीर

वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त