राष्ट्रीय

स्नान करताना गंगेत सहा जणांचा बुडून मृत्यू

संदीप कटियार यांनी सुरू केलेल्या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी काही नातेवाईक आले होते

वृत्तसंस्था

कानपूरच्या बिल्हौरमधील अरौल कोठी घाटावर गंगेत स्नान करताना सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यात एक तरुण आणि चार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

अरौल शहरातील बरांडा गावात राहणाऱ्या संदीप कटियार यांनी सुरू केलेल्या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी काही नातेवाईक आले होते. नातेवाईकांसह काही मुले गंगा नदीत अंघोळीसाठी गेली असता ही दुर्घटना घडली. यामध्ये अनुष्का उर्फ ​​दिव्या कुमार, बहीण अंशिका, मुलगा राम सिंह, फारुखाबादमधील रामबाबू, तनुष्का,नुष्का, सृष्टी आणि गौरी यांच्यासह आठ ते १० जण अंघोळीसाठी कोठी घाटावर गेले होते. यावेळी यातील सहा जणांचा बुडून मृत्यू झाला.

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai : धरणक्षेत्रात पाऊसधारा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७३ टक्क्यांनी वाढ

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी