File Photo 
राष्ट्रीय

ओदिशात ट्रक अपघातात सहा कामगार ठार

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

नवशक्ती Web Desk

मलकानगिरी : ओदिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात शनिवारी चित्रकोंडाहून जोडंबाकडे जाणारा सिमेंटने भरलेला ट्रक हंतलागुडा घाटात उलटून त्यातील सहा कामगार ठार झाले आणि सात जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच अन्य एका दुर्घटनेत ट्रक व मोटारसायकल यांच्या टकरीत तीन जण ठार झाले. नयागड जिल्ह्यातील दसपल्ला भागात हा अपघात झाला.

मुंबईत १ लाख झाडे लावण्याचा संकल्पच महापौर रितू तावडे यांच्याकडून हरित मुंबई अभियानाला गती

Navi Mumbai : पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना; अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंदचे आदेश

'नहीं बोलूंगा मराठी!'; मुंबई सेंट्रल स्थानकावरील चौकशी कक्षात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी, VIDEO व्हायरल

Ambernath : घरात CCTV लावून ठेवायचा पाळत; लग्नानंतर ४८ दिवसांत विवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीसह तिघांना अटक

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला गती मिळणार; प्रकल्पांसाठी 'एमआरव्हीसी'ला हवेत ६४,६४४ कोटी