राष्ट्रीय

सरकारी नोकरीसाठी दोनच अपत्यांचा निकष, राजस्थान सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची मोहर

केवळ दोन अपत्ये असल्यासच सरकारी नोकरी मिळेल, या राजस्थान सरकारच्या पात्रतेच्या निकषावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मान्यतेची मोहर उमटवली.

Swapnil S

नवी दिल्ली : केवळ दोन अपत्ये असल्यासच सरकारी नोकरी मिळेल, या राजस्थान सरकारच्या पात्रतेच्या निकषावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मान्यतेची मोहर उमटवली. सरकारचा हा निर्णय भेदभाव करणारा नाही आणि त्यामुळे घटनेचेही उल्लंघन होत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

राजस्थान विविध सेवा (दुरुस्ती) नियम २००१ द्वारे ज्या उमेदवारांना दोनपेक्षा अधिक अपत्ये आहेत त्यांना सरकारी नोकरीत घेण्यावर बंदी आहे.

लष्करातून २०१७ मध्ये निवृत्त झाल्यानंतर रामजी लाल जाट यांनी राजस्थान पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी २५ मे २०१८ रोजी अर्ज केला होता. जाट यांनी दोन अपत्ये निकषाला आव्हान देणारी याचिका केली होती. ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने दोन अपत्ये निकषावर मान्यतेची मोहर उमटवली.

न्या. सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने स्पष्ट केले की, राजस्थान पोलीस दुय्यम सेवा नियम १९८९मधील २४ (४) कलमामध्ये म्हटले आहे की, ज्या उमेदवारांना १ जून २००२ रोजी अथवा त्यानंतर दोन किंवा त्याहून अधिक अपत्ये आहेत ते उमेदवार सरकारी नोकरीसाठी पात्र नाहीत, हा नियम भेदभाव करणारा नाही आणि त्यामुळे घटनेचेही उल्लंघन होत नाही.

राजस्थान सरकारचे पात्रतेचे निकष भेदभाव करणारे नाही. उलट त्यामागे कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देणे हा या तरतुदीमागील उद्देश आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण