राष्ट्रीय

सरन्यायाधीशांकडून दोन नवीन न्यायाधीशांना शपथ

सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी शुक्रवारी बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ दिली.

Swapnil S

नवी दिल्लीः सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी शुक्रवारी बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ दिली.

या दोघांची २७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात बढती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ झाली आहे.

न्या. पंचोली यांना २ ऑक्टोबर २०३१ रोजी न्या. जॉयमाला बागची यांच्या निवृत्तीनंतर ३ ऑक्टोबर २०३१ रोजी सरन्यायाधीशपद मिळणार असून ते २७ मे २०३३ पर्यंत कार्यरत राहतील.

२५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने आराधे आणि पंचोली यांची नावे सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशपदी बढतीसाठी केंद्र सरकारला शिफारस केली होती. मात्र, कॉलेजियमच्या सदस्य व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी पंचोली यांच्या नियुक्तीबाबत ठाम असहमती नोंदवली. त्यांनी म्हटले की त्यांची नियुक्ती न्यायव्यवस्थेसाठी "उलट परिणाम करणारी" ठरेल.

सर्वोच्च न्यायालयातील एकमेव महिला न्यायाधीश असलेल्या नागरत्ना यांनी अनेक मुद्द्यांवर आपला विरोध नोंदवत म्हटले की त्यांची नियुक्ती पुढे नेल्यास "कॉलेजियम प्रणालीकडे उरलेला विश्वासही कमी होईल".

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी