राष्ट्रीय

तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

आठवडाभर अटकेपासून संरक्षण दिले

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : साल २००२ च्या गोध्रा हत्याकांड संबंधित प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी येत्या १९ जुलै रोजी आहे. तोपर्यंत तिस्ता सेटलवाड यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याचा आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. बी. आर. गवर्इ, ए. एस. बोपान्ना आणि दीपांकर दत्त यांच्या खंडपीठाने गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात गुजरात सरकारला नोटीस बजावली. सेटलवाड यांनी त्या संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यापूर्वी १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेटलवाड यांना एक आठवडाभर अटकेपासून संरक्षण दिले होते. गोध्रा हत्याकांडात निष्पाप निर्दोष लोकांना दंगलीच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी खोटे पुरावे रचल्याप्रकरणी सेटलवाड यांच्यावर खटला सुरू आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक