राष्ट्रीय

सरकार ४ लाख टन तूरडाळ आयात करणार

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : तुरडाळीचे दर देशात २०० रुपये किलोच्या वर गेल्याने सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. त्यातच निवडणुका जवळ आल्याने सरकारने तूरडाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ४ लाख टन तूरडाळ जानेवारीत, तर १० लाख टन उडीद डाळ फेब्रुवारीत मान्यमारमधून आयात करणार आहे, अशी माहिती केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत डाळींचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज आहे.

ऑक्टोबरमध्ये तूरडाळीचे दर (४०.९४ टक्के), मूगडाळीचे दर (१२.७५ टक्के), चणाडाळीचे (११.१६ टक्के) दर वाढले आहेत, तर डाळींची किरकोळ महागाई १८.७९ टक्क्याने वाढली. तुरीचा महागाईवाढीचा दर ३७.३ टक्के आहे. तुरीचे दर कमी होण्यासाठी सरकारने आफ्रिका व म्यानमारमधून डाळ आयात करण्याचे ठरवले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस