राष्ट्रीय

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पद्धत आक्षेपार्ह

Swapnil S

चंदिगड : हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी गुरुवारी शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी अवलंबलेल्या पद्धतीवर टीका केली आणि ते म्हणाले की, ते आक्रमणकारी सैन्याप्रमाणे दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ते म्हणाले की शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉली, अर्थ-मूव्हर्स आणि वर्षभरासाठी रेशन घेऊन अगदी सैन्याप्रमाणे फिरत आहेत. दिल्लीला जाण्याच्या शेतकऱ्यांच्या आवाहनावर खट्टर म्हणाले की, त्यांच्या पद्धतीवर आमचा आक्षेप आहे. त्यांनी दिल्लीला जाण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही. तिथे ट्रेन, बस आणि त्यांची स्वतःची वाहने आहेत. पण ट्रॅक्टर हे वाहतुकीचे साधन नाही. ते शेतीचे साधन आहे. पंजाबमधील शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी दिल्लीकडे कूच करू इच्छित आहेत. केंद्राच्या प्रस्तावांच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे सांगून शेतकरी नेत्यांनी बैठक होईपर्यंत राष्ट्रीय राजधानीकडे जाण्याचा कोणताही नवीन प्रयत्न करणार नसल्याचे सांगितले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस