राष्ट्रीय

आलिशान घरांच्या भाड्यात दोन वर्षांत झाली वाढ

शहरांतील पॉश निवासी वसाहतींमधील सरासरी मासिक भाडे गेल्या दोन वर्षांत आठ ते १८ टक्क्यांनी वाढले

वृत्तसंस्था

देशातील पहिल्या सात शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांत आलिशान घरांच्या भाड्यात आठ ते १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिअल इस्टेट सल्लागार अॅनारॉकच्या मते, देशातील प्रमुख शहरांतील पॉश निवासी वसाहतींमधील सरासरी मासिक भाडे गेल्या दोन वर्षांत आठ ते १८ टक्क्यांनी वाढले आहे. तर त्यांचे भांडवली मूल्य या काळात केवळ दोन ते नऊ टक्क्यांनी वाढले आहे.

अॅनारॉकच्या मते, दिल्ली-एनसीआर मुंबई महानगर प्रदेश , चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या देशातील सात प्रमुख शहरांमध्ये खरेदी आणि भाड्याने देण्यासाठी लक्झरी निवासी मालमत्तांची मागणी वाढली आहे. या काळात मुंबईतील वरळीमध्ये सर्वाधिक १८ टक्के भाडेवाढ झाली आहे. या भागातील किमान २००० चौरस फुटांच्या घरांचे दरमहा २ लाख रुपये असलेले भाडे यंदा २.३५ लाख रुपयांवर पोहोचले आहे.

Mumbai : झाडांवर विषप्रयोग केला तर थेट गुन्हा दाखल होणार; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांचे निर्देश

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात; प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवण्याची महसूल विभागाची तयारी

Mumbai : म्हाडाकडे घरबसल्या करता येणार तक्रार; सीएफसी@होम, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे अनावरण

Mumbai : शस्त्रक्रियांचा दर्जा, अचूकता, सुरक्षितता वाढणार; KEM रुग्णालयात प्रगत ‘व्हेसल सीलर’ तंत्रज्ञान

Mumbai : नालेसफाईच्या कामात तीन तेरा; मिठी नदीतील गाळ उपसा करण्यात अपुरी यंत्रणा, सत्ताधारी पक्षाच्या पाहणी दौऱ्यात पोलखोल