राष्ट्रीय

आलिशान घरांच्या भाड्यात दोन वर्षांत झाली वाढ

वृत्तसंस्था

देशातील पहिल्या सात शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांत आलिशान घरांच्या भाड्यात आठ ते १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिअल इस्टेट सल्लागार अॅनारॉकच्या मते, देशातील प्रमुख शहरांतील पॉश निवासी वसाहतींमधील सरासरी मासिक भाडे गेल्या दोन वर्षांत आठ ते १८ टक्क्यांनी वाढले आहे. तर त्यांचे भांडवली मूल्य या काळात केवळ दोन ते नऊ टक्क्यांनी वाढले आहे.

अॅनारॉकच्या मते, दिल्ली-एनसीआर मुंबई महानगर प्रदेश , चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या देशातील सात प्रमुख शहरांमध्ये खरेदी आणि भाड्याने देण्यासाठी लक्झरी निवासी मालमत्तांची मागणी वाढली आहे. या काळात मुंबईतील वरळीमध्ये सर्वाधिक १८ टक्के भाडेवाढ झाली आहे. या भागातील किमान २००० चौरस फुटांच्या घरांचे दरमहा २ लाख रुपये असलेले भाडे यंदा २.३५ लाख रुपयांवर पोहोचले आहे.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग