राष्ट्रीय

आलिशान घरांच्या भाड्यात दोन वर्षांत झाली वाढ

शहरांतील पॉश निवासी वसाहतींमधील सरासरी मासिक भाडे गेल्या दोन वर्षांत आठ ते १८ टक्क्यांनी वाढले

वृत्तसंस्था

देशातील पहिल्या सात शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांत आलिशान घरांच्या भाड्यात आठ ते १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिअल इस्टेट सल्लागार अॅनारॉकच्या मते, देशातील प्रमुख शहरांतील पॉश निवासी वसाहतींमधील सरासरी मासिक भाडे गेल्या दोन वर्षांत आठ ते १८ टक्क्यांनी वाढले आहे. तर त्यांचे भांडवली मूल्य या काळात केवळ दोन ते नऊ टक्क्यांनी वाढले आहे.

अॅनारॉकच्या मते, दिल्ली-एनसीआर मुंबई महानगर प्रदेश , चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या देशातील सात प्रमुख शहरांमध्ये खरेदी आणि भाड्याने देण्यासाठी लक्झरी निवासी मालमत्तांची मागणी वाढली आहे. या काळात मुंबईतील वरळीमध्ये सर्वाधिक १८ टक्के भाडेवाढ झाली आहे. या भागातील किमान २००० चौरस फुटांच्या घरांचे दरमहा २ लाख रुपये असलेले भाडे यंदा २.३५ लाख रुपयांवर पोहोचले आहे.

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?