राष्ट्रीय

आलिशान घरांच्या भाड्यात दोन वर्षांत झाली वाढ

शहरांतील पॉश निवासी वसाहतींमधील सरासरी मासिक भाडे गेल्या दोन वर्षांत आठ ते १८ टक्क्यांनी वाढले

वृत्तसंस्था

देशातील पहिल्या सात शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांत आलिशान घरांच्या भाड्यात आठ ते १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिअल इस्टेट सल्लागार अॅनारॉकच्या मते, देशातील प्रमुख शहरांतील पॉश निवासी वसाहतींमधील सरासरी मासिक भाडे गेल्या दोन वर्षांत आठ ते १८ टक्क्यांनी वाढले आहे. तर त्यांचे भांडवली मूल्य या काळात केवळ दोन ते नऊ टक्क्यांनी वाढले आहे.

अॅनारॉकच्या मते, दिल्ली-एनसीआर मुंबई महानगर प्रदेश , चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या देशातील सात प्रमुख शहरांमध्ये खरेदी आणि भाड्याने देण्यासाठी लक्झरी निवासी मालमत्तांची मागणी वाढली आहे. या काळात मुंबईतील वरळीमध्ये सर्वाधिक १८ टक्के भाडेवाढ झाली आहे. या भागातील किमान २००० चौरस फुटांच्या घरांचे दरमहा २ लाख रुपये असलेले भाडे यंदा २.३५ लाख रुपयांवर पोहोचले आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत