राष्ट्रीय

१७ भारतीय ओलीस, सुटकेसाठी प्रयत्न सुरू

राजनैतिक मार्गाने तेहरान आणि दिल्लीत इराणच्या अधिकाऱ्यांशी भारत संपर्क ठेवून आहे, त्यांची लवकर सुटका व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 'एमएससी एरीज' हे मालवाहू जहाज इराणने ताब्यात घेतले असल्याची आम्हाला कल्पना आहे, त्या जहाजावर १७ भारतीय नागरिक आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्कराने इस्रायल-संबंधित मालवाहू जहाज ताब्यात घेतले असून त्यावर १७ भारतीय नागरिक आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारत सातत्याने इराणच्या संपर्कात आहे.

राजनैतिक मार्गाने तेहरान आणि दिल्लीत इराणच्या अधिकाऱ्यांशी भारत संपर्क ठेवून आहे, त्यांची लवकर सुटका व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 'एमएससी एरीज' हे मालवाहू जहाज इराणने ताब्यात घेतले असल्याची आम्हाला कल्पना आहे, त्या जहाजावर १७ भारतीय नागरिक आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. सदर मालवाहू जहाज होर्मूजच्या सामुद्रधुनीतून जात असताना इराणच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू

इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने शनिवारी सकाळी ते ताब्यात घेतले. जहाजावरील १७ भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सातत्याने इराणच्या संपर्कात आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली