राष्ट्रीय

१७ भारतीय ओलीस, सुटकेसाठी प्रयत्न सुरू

राजनैतिक मार्गाने तेहरान आणि दिल्लीत इराणच्या अधिकाऱ्यांशी भारत संपर्क ठेवून आहे, त्यांची लवकर सुटका व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 'एमएससी एरीज' हे मालवाहू जहाज इराणने ताब्यात घेतले असल्याची आम्हाला कल्पना आहे, त्या जहाजावर १७ भारतीय नागरिक आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्कराने इस्रायल-संबंधित मालवाहू जहाज ताब्यात घेतले असून त्यावर १७ भारतीय नागरिक आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारत सातत्याने इराणच्या संपर्कात आहे.

राजनैतिक मार्गाने तेहरान आणि दिल्लीत इराणच्या अधिकाऱ्यांशी भारत संपर्क ठेवून आहे, त्यांची लवकर सुटका व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 'एमएससी एरीज' हे मालवाहू जहाज इराणने ताब्यात घेतले असल्याची आम्हाला कल्पना आहे, त्या जहाजावर १७ भारतीय नागरिक आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. सदर मालवाहू जहाज होर्मूजच्या सामुद्रधुनीतून जात असताना इराणच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू

इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने शनिवारी सकाळी ते ताब्यात घेतले. जहाजावरील १७ भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सातत्याने इराणच्या संपर्कात आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai : खार येथील जान्हवी कुकरेजाच्या आईची उच्च न्यायालयात धाव; मैत्रीण दिया पडळकरच्या निर्दोष सुटकेला आव्हान

मुंबईत सर्वसामान्यांसाठी २ हजार ६४० घरे; आजपासून म्हाडाचा अर्ज भरता येणार

मुंबई एअरपोर्टवर १० रुपयांत चहा; राघव चड्ढांचा उडान यात्री कॅफेतील अनुभव चर्चेत, पाहा Video

Mumbai : मालमत्ता करासाठी अखेरचे दोन दिवस; सुविधा केंद्र रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

सायबर फसवणुकीवर लगाम; RBIकडून ऑनलाइन पेमेंटच्या नियमांत बदल, १ एप्रिलपासून नवे सुरक्षा नियम लागू