PM
राष्ट्रीय

ही तर नमोशाही... -जयराम रमेश यांची टीका

७८ विरोधी सदस्यांना संसदेतून निलंबित केल्यानंतर मंगळवारी कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल लोकसभेच्या ४९ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले.

Swapnil S

नवी दिल्ली : नवीन संसदेत कोणत्याही अर्थपूर्ण चर्चेशिवाय कठोर विधेयके मंजूर करण्यासाठी संपूर्ण शुद्धीकरण केले जात आहे, असा टोला हाणत काँग्रेसने मंगळवारी सर्व जुलमी कारभाराला ‘नमोशाही’ असे संबोधले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन घुसखोरांच्या प्रवेशाची सोय करणारे भाजप खासदार मुक्त व्हावेत यासाठी हे केले जात आहे.

७८ विरोधी सदस्यांना संसदेतून निलंबित केल्यानंतर मंगळवारी कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल लोकसभेच्या ४९ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षांनी हा टीकेचा भडिमार सुरू केला. 

जयराम रमेश यांनी मंगळवारी दावा केला की, कोणत्याही अर्थपूर्ण चर्चेविना कठोर विधेयके मंजूर केली जावीत यासाठी हे संपूर्ण निर्मूलन केले गेले आहे आणि त्यामुळे दोन घुसखोरांना लोकसभेत प्रवेश करण्याची सुविधा देणारे 'ते' भाजप खासदार मुक्त राहिले आहेत. एक प्रकारे नव्या संसदेत सर्व जुलमी राजवटीतील 'नमोक्रसी' स्पष्ट होत आहे, असेही जयराम रमेश यांनी एक्सवर व्यक्त केलेल्या पोस्टवर म्हटले आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली