PM
राष्ट्रीय

ही तर नमोशाही... -जयराम रमेश यांची टीका

७८ विरोधी सदस्यांना संसदेतून निलंबित केल्यानंतर मंगळवारी कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल लोकसभेच्या ४९ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले.

Swapnil S

नवी दिल्ली : नवीन संसदेत कोणत्याही अर्थपूर्ण चर्चेशिवाय कठोर विधेयके मंजूर करण्यासाठी संपूर्ण शुद्धीकरण केले जात आहे, असा टोला हाणत काँग्रेसने मंगळवारी सर्व जुलमी कारभाराला ‘नमोशाही’ असे संबोधले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन घुसखोरांच्या प्रवेशाची सोय करणारे भाजप खासदार मुक्त व्हावेत यासाठी हे केले जात आहे.

७८ विरोधी सदस्यांना संसदेतून निलंबित केल्यानंतर मंगळवारी कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल लोकसभेच्या ४९ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षांनी हा टीकेचा भडिमार सुरू केला. 

जयराम रमेश यांनी मंगळवारी दावा केला की, कोणत्याही अर्थपूर्ण चर्चेविना कठोर विधेयके मंजूर केली जावीत यासाठी हे संपूर्ण निर्मूलन केले गेले आहे आणि त्यामुळे दोन घुसखोरांना लोकसभेत प्रवेश करण्याची सुविधा देणारे 'ते' भाजप खासदार मुक्त राहिले आहेत. एक प्रकारे नव्या संसदेत सर्व जुलमी राजवटीतील 'नमोक्रसी' स्पष्ट होत आहे, असेही जयराम रमेश यांनी एक्सवर व्यक्त केलेल्या पोस्टवर म्हटले आहे.

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना