PM
राष्ट्रीय

ही तर नमोशाही... -जयराम रमेश यांची टीका

७८ विरोधी सदस्यांना संसदेतून निलंबित केल्यानंतर मंगळवारी कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल लोकसभेच्या ४९ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले.

Swapnil S

नवी दिल्ली : नवीन संसदेत कोणत्याही अर्थपूर्ण चर्चेशिवाय कठोर विधेयके मंजूर करण्यासाठी संपूर्ण शुद्धीकरण केले जात आहे, असा टोला हाणत काँग्रेसने मंगळवारी सर्व जुलमी कारभाराला ‘नमोशाही’ असे संबोधले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन घुसखोरांच्या प्रवेशाची सोय करणारे भाजप खासदार मुक्त व्हावेत यासाठी हे केले जात आहे.

७८ विरोधी सदस्यांना संसदेतून निलंबित केल्यानंतर मंगळवारी कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल लोकसभेच्या ४९ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षांनी हा टीकेचा भडिमार सुरू केला. 

जयराम रमेश यांनी मंगळवारी दावा केला की, कोणत्याही अर्थपूर्ण चर्चेविना कठोर विधेयके मंजूर केली जावीत यासाठी हे संपूर्ण निर्मूलन केले गेले आहे आणि त्यामुळे दोन घुसखोरांना लोकसभेत प्रवेश करण्याची सुविधा देणारे 'ते' भाजप खासदार मुक्त राहिले आहेत. एक प्रकारे नव्या संसदेत सर्व जुलमी राजवटीतील 'नमोक्रसी' स्पष्ट होत आहे, असेही जयराम रमेश यांनी एक्सवर व्यक्त केलेल्या पोस्टवर म्हटले आहे.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद