राष्ट्रीय

टाटा समूहाच्या दोन कंपन्या कर्नाटकात २,३०० कोटी गुंतवणार

भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असेल आणि संपूर्ण एमआरओसाठी दरवाजे उघडतील, असा दावा पाटील यांनी केला.

Swapnil S

बंगळुरू : टाटा समूहाच्या कंपन्या एअर इंडिया आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) यांनी कर्नाटकमध्ये सुमारे १,६५० लोकांना रोजगार देणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये २,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे, असे सोमवारी येथे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी झालेल्या स्वाक्षरी समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि विशाल व मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील उपस्थित होते. पाटील म्हणाले की, एअर इंडियाची बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरफ्रेम देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) सुविधा १,३०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक योजनेसह स्थापन करण्याची योजना आहे. त्यात १,२००लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असेल आणि संपूर्ण एमआरओसाठी दरवाजे उघडतील, असा दावा पाटील यांनी केला. एअर इंडिया बंगळुरू विमानतळावर ‘एव्हिएशन हब’ तयार करेल. त्यामुळे आर्थिक उलाढालीत आणि बंगळुरूमार्गे हवाई वाहतूक वाढेल, असेही ते म्हणाले.

"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."

Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत

अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कसा केला? RTI कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी

'पुन्हा एकत्र राहू' म्हणत बोलावलं; काही वेळातच घटस्फोटित पत्नीची हत्या, घटनेआधीची Reel व्हायरल

Bhiwandi Building Collapse : धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करा; महापौरांचे आदेश