राष्ट्रीय

टाटा समूहाच्या दोन कंपन्या कर्नाटकात २,३०० कोटी गुंतवणार

Swapnil S

बंगळुरू : टाटा समूहाच्या कंपन्या एअर इंडिया आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) यांनी कर्नाटकमध्ये सुमारे १,६५० लोकांना रोजगार देणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये २,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे, असे सोमवारी येथे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी झालेल्या स्वाक्षरी समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि विशाल व मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील उपस्थित होते. पाटील म्हणाले की, एअर इंडियाची बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरफ्रेम देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) सुविधा १,३०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक योजनेसह स्थापन करण्याची योजना आहे. त्यात १,२००लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असेल आणि संपूर्ण एमआरओसाठी दरवाजे उघडतील, असा दावा पाटील यांनी केला. एअर इंडिया बंगळुरू विमानतळावर ‘एव्हिएशन हब’ तयार करेल. त्यामुळे आर्थिक उलाढालीत आणि बंगळुरूमार्गे हवाई वाहतूक वाढेल, असेही ते म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस