सुप्रीम कोर्ट संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली; सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी

मुस्लिम महिलांच्या वारसा हक्काबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी करताना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण विधान केले. देशात आता समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : मुस्लिम महिलांच्या वारसा हक्काबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी करताना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण विधान केले. देशात आता समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश सूर्य कान्त आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

शरियत कायद्यामुळे वारसा हक्काच्या बाबतीत मुस्लिम महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील सर्व महिलांना समान हक्क निश्चित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देशात समान नागरी कायदा लागू करणे हा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. वैयक्तिक कायद्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी विधिमंडळाने यावर कारवाई करावी, असे आवाहन न्यायालयाने केले.

आपण याचिकेत सुधारणा का करीत नाही आणि पर्यायी तरतुदींचा विचार का करीत नाही, असे सरन्यायाधीशांनी वकिलांना विचारले. भारतीय महिलांना त्यांच्या हक्कांचा एक महत्त्वाचा भाग नाकारला जात आहे, हा केवळ १९३७च्या कायद्याचा प्रश्न नाही. यावर वकिलांनी आम्ही याचिकेत सुधारणा करू, असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने याचिकेची सुनावणी पुढे ढकलली आणि सुधारित याचिका दाखल करण्याची परवानगी दिली.

Mumbai : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हमाल, पार्किंग, एसी प्रतीक्षागृहाचे अधिकृत दर जाहीर; जादा पैसे घेतल्यास तक्रार करा

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं?