राष्ट्रीय

अदानी, संभल, मणिपूरवरून संसदेत गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाचखोरी प्रकरण आणि संभल व मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी संसदेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

Swapnil S

नवी दिल्ली : अदानी लाचखोरी प्रकरण आणि संभल व मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी संसदेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

लोकसभेत दुपारी कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहातील मोकळ्या जागेत धावत गेले आणि त्यांनी घोषणाबाजी करीत अदानी लाचखोरी आणि संभल हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

या गदारोळातच बंदरे आणि जलमार्ग मंत्री सवार्नंद सोनोवाल यांनी कोस्टल शिपिंग विधेयक मांडले.

सभागृहात गदारोळ सुरू असताना पीठासीन अधिकारी संध्या रे यांनी सदस्यांना शांत राहण्याची सूचना केली. मात्र, विरोधी सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत गोंधळ सुरू ठेवल्याने संध्या रे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभारासाठी तहकूब केले.

दरम्यान, राज्यसभेतही अदानी, संभल हिंसाचार आणि मणिपूरचा प्रश्न विरोधी सदस्यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

व्याजदर यंदा स्थिरच? आजपासून पतधोरण समितीची आढावा बैठक; बुधवारी निर्णय जाहीर होणार

US-Iran-Israel War : वैमानिकाची थरारक सुटका; अमेरिकेची 'ऐतिहासिक' मोहीम : शेकडो कमांडो, डझनभर लढाऊ विमानांचा सहभाग

Mumbai : मेट्रो लोकार्पणाला अखेर उद्याचा मुहूर्त

बारामतीत काँग्रेसचा उमेवार जाहीर; सुनेत्रांचा फोन निष्फळ, काँग्रेसतर्फे आकाश मोरे

आखाती युद्धामुळे कांद्याची निर्यात तब्बल ४५ टक्क्यांनी घटली; कंटेनर वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याचा परिणाम