राष्ट्रीय

अदानी, संभल, मणिपूरवरून संसदेत गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाचखोरी प्रकरण आणि संभल व मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी संसदेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

Swapnil S

नवी दिल्ली : अदानी लाचखोरी प्रकरण आणि संभल व मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी संसदेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

लोकसभेत दुपारी कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहातील मोकळ्या जागेत धावत गेले आणि त्यांनी घोषणाबाजी करीत अदानी लाचखोरी आणि संभल हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

या गदारोळातच बंदरे आणि जलमार्ग मंत्री सवार्नंद सोनोवाल यांनी कोस्टल शिपिंग विधेयक मांडले.

सभागृहात गदारोळ सुरू असताना पीठासीन अधिकारी संध्या रे यांनी सदस्यांना शांत राहण्याची सूचना केली. मात्र, विरोधी सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत गोंधळ सुरू ठेवल्याने संध्या रे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभारासाठी तहकूब केले.

दरम्यान, राज्यसभेतही अदानी, संभल हिंसाचार आणि मणिपूरचा प्रश्न विरोधी सदस्यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

ठाण्यात बुधवारी पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे पालिकेचे आवाहन

Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Jalna : सरकारसोबतची चर्चा निष्फळ; मनोज जरांगेंचे अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

काय सांगता! दादरचा 'अशोक वडा पाव' जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित सँडविचच्या यादीत; टॉप ४० मध्ये मिळवले स्थान