राष्ट्रीय

मणिपुरात पुन्हा हिंसाचार ; तिघांचा मृत्यू

गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे

नवशक्ती Web Desk

गुवाहाटी : मंगळवारी सकाळी सात वाजता मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरक्षा दलांकडून मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सकाळी ७ वाजता घडली. कुकी-झोमी जमातीतील तीन गावकरी एका वाहनातून प्रवास करीत होते. तेव्हा कांगपोकपी जिल्ह्यातील इरेंग नागा खेड्याजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मृतांमध्ये सातेनोव तुबार्इ, एंगम्मीनलून लॉव्हूम आणि एंगम्मीनलून किपगेन यांचा समावेश आहे. गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. अधूनमधून गोळीबार आणि त्यात मृत्यू होण्याच्या घटना घडतच आहेत. शुक्रवारी देखील दोघांचा मृत्यू, तर आसाम रायफल आणि मणिपूर पोलिसांमधील काहीजण जखमी झाले होते. सरकार आता या वांशिक दंगलींवर राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या डोंगराळ भागातील नगरपरिषदांना अधिक स्वातंत्र्य देण्यास तयार असल्याचे केंद्र सरकारला कळवले आहे, मात्र कुकींना स्वतंत्र प्रशासन देण्यास सरकार तयार नाही. कारण राज्यात अन्य वंशाचे लोकही आहेत.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा