Weather Update : होरपळ सुरूच; ७५ टक्के देश तापलाय प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

Weather Update : होरपळ सुरूच; ७५ टक्के देश तापलाय

देशभरात तीव्र उष्णतेचा प्रकोप सुरूच असून २ डझन शहरांचे तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले.

Swapnil S

नवी दिल्ली : देशभरात तीव्र उष्णतेचा प्रकोप सुरूच असून २ डझन शहरांचे तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. आठ राज्यांतील ३४ शहरांमध्ये सकाळी ९:३० वाजताच पारा ३८ ते ४२ अंशांपर्यंत जात आहे. यूपीमधील बांदा सलग तिसऱ्या दिवशी ४८ अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण ठिकाण बनले, तर वर्ध्यात पारा ४७.१अंशांवर गेला होता. या वर्षातील हे सर्वाधिक तापमान आहे.

हवामान विभागाने पुढील ३ दिवस महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या ३ राज्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’ जारी केला. वर्ध्यात गेल्या ४ दिवसात उष्माघात व पाण्याविना ९ जण दगावले आहेत. दरम्यान, राज्यातील १५ शहरांचे तापमान ४० अंशांच्या पार होते. या शहरांमध्ये वर्धा ४७.१अंश, नागपूर ४६.६ अंश, अमरावती ४६.४अंश, चंद्रपूर ४६.२अंश, अकोला ४५.२ अंश, यवतमाळ ४५.२अंश, गोंदिया ४४.९ अंश, नांदेड ४३.० अंश, वाशिम ४२.६ अंश आदीचा समावेश आहे.

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

एमडीची ‘डिलिव्हरी’ होण्याआधीच दणका; कोपरीत २.३० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त, गोवंडीतील तरुण पोलिसांच्या जाळ्यात

माथेरानचा एकमेव रस्ता ठरतोय पर्यटकांसाठी ‘कोंडीचा सापळा’; नेरळ-माथेरान ८ किमीच्या प्रवासाकरिता ५-६ तासांची प्रतीक्षा

मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा वाढता धोका; तीन महिन्यांत मलेरिया ३,१७७, लेप्टोचे १८९ रुग्ण

डिजिटल वर्गांचा दिखावा नको! ठाणे महापालिका शाळांतील डिजिटल शिक्षणावर नगरसेवकांवर तीव्र आक्षेप