राष्ट्रीय

अयोध्येला पाठविणार श्री रामाच्या आजोळचा ‘सुगंधित तांदूळ’

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी छत्तीसगडमधून एकूण ३०० मेट्रिक टन सुगंधित तांदूळ शनिवारी रवाना करण्यात आला. छत्तीसगड ही श्रीरामाची आजोळची भूमी आहे.

Swapnil S

रायपूर : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी छत्तीसगडमधून एकूण ३०० मेट्रिक टन सुगंधित तांदूळ शनिवारी रवाना करण्यात आला. छत्तीसगड ही श्रीरामाची आजोळची भूमी आहे.

व्हीआयपी रोडवरील श्री राम मंदिर येथे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी तांदूळ वाहतूक करणाऱ्या ११ ट्रकना भगवा झेंडा दाखवून रवाना केले, असे राज्याच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. छत्तीसगड प्रदेश राईस मिलर्स असोसिएशनने 'सुगंधित चावल अर्पण समरोह' या नावाने कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेक समारंभात प्रसाद म्हणून तांदूळ वापरण्याची ऑफर दिली होती.

यावेळी राज्यमंत्री ब्रिजमोहन अग्रवाल, श्याम बिहारी जैस्वाल, दयालदास बघेल आणि लक्ष्मी राजवाडे, भाजप खासदार सुनील सोनी आणि असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी मंदिरात प्रार्थना केली आणि राज्याच्या सुख आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या, असे निवेदनात म्हटले आहे.

छत्तीसगड राज्याला 'भाताची वाटी' म्हणून ओळखले जाते, ते भगवान रामाचे आजोळ असून अभ्यासकांच्या मते, अयोध्येतून १४ वर्षांच्या वनवासात भगवान राम सध्याच्या छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी गेले होते. राजधानी रायपूरपासून सुमारे २७ किमी अंतरावर असलेले चांदखुरी हे गाव प्रभू रामाची आई माता कौशल्या यांचे जन्मस्थान मानले जाते. गावात असलेल्या प्राचीन माता कौशल्या मंदिराचा जीर्णोद्धार राज्यातील मागील काँग्रेस सरकारच्या काळात रूपांतरित करण्यात आले होते.

मदतीचेही सुयोग्य वाटप व्हायला हवे!

अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल आणि स्वदेशीचा जागर

आजचे राशिभविष्य, ३० सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा