राष्ट्रीय

अर्थव्यवस्थेत सुधारणा, तिमाहीत देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार

६३ टक्के कंपन्यांना सुधारणा प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेचा विकास दर राखण्यासाठी अतिरिक्त लोकांची आवश्यकता असेल

वृत्तसंस्था

जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील. गेल्या आठ वर्षांच्या तुलनेत यावेळी लोकांना जास्त नोकऱ्या मिळू शकतात. एका सर्वेक्षणात असे म्हटले आहे की ६३ टक्के कंपन्यांना सुधारणा प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेचा विकास दर राखण्यासाठी अतिरिक्त लोकांची आवश्यकता असेल, ज्यामुळे कंपन्या जलद भरती करतील. तथापि, या कालावधीत, सुमारे १२ टक्के कंपन्या लोकांना कामावरून काढू शकतात, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

२४ टक्के कंपन्यांमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. म्हणजेच ते कर्मचाऱ्यांना काढणार नाहीत आणि नवीन लोकांची भरती करणार नाहीत. मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आउटलुक सर्वेक्षणानुसार, तिसऱ्या तिमाहीसाठी निव्वळ रोजगारात वाढ ५१ टक्के असण्याची शक्यता आहे, जो २०१४ पासून आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. रोजगाराचा दृष्टीकोन म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याचा अंदाज आहे.

आशिया-पॅसिफिकमध्ये नोकरभरतीत भारत सर्वोत्तम असणार आहे. त्यानुसार भारतात - ५१ टक्के, सिंगापूर ४० टक्के, ऑस्ट्रेलिया ३८ टक्के, हाँगकाँग ११ टक्के, जपान चार टक्के, तैवान - तीन टक्के नोकरभरती होऊ शकते.

अस्थिरता असूनही अनेक क्षेत्रे तेजीत

मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंटचे एमडी संदीप गुलाटी म्हणाले की, जागतिक स्तरावर वाढती महागाई आणि वाढती अस्थिरता असूनही, देशातील अनेक क्षेत्रांमध्ये परिस्थिती सावरत आहे. नवीन भरती संदर्भात केलेल्या सर्वेक्षणात ३ हजार कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबरच्या तिमाहीत भरती भावनांमध्ये ४६ टक्के गुणांची सुधारणा झाली आहे. एप्रिल-जूनच्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; जळगाव, नाशिक, पालघरमध्ये आढळले उष्माघाताचे रुग्ण

इमारतींना ओसी देण्यापूर्वी PNG जोडणी अनिवार्य करा - छगन भुजबळ

आता दिल्लीलाही मिळाले दुसरे विमानतळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

भारताकडे येणाऱ्या दोन LPG जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली; ओमानच्या आखाताच्या दिशेने प्रवास सुरू

टाळेबंदीची अफवा पसरवणारे देशद्रोही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला कडक कारवाईचा इशारा