राष्ट्रीय

ज्ञानवापीबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले, "ज्ञानवापीला मशीद म्हणाल तर..."

ज्ञानवापी मशीदीत त्रिशुळ काय करतोय, असा सवाल देखील योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

नवशक्ती Web Desk

देशभरात ज्ञानवापीवरुन वातावर तापताना दिसत आहे. यासाठी हिंदुत्ववादी गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. कनिष्ठ न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. असं असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे.

ज्ञानवापीला मशीद म्हणालात तर वाद होणार असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. ज्ञानवापीत अनेक देवतांच्या प्रतिमा आहेत. या प्रतिमा हिंदुंनी ठेवलेल्या नाहीत. जर ज्ञानवापीला मशीद म्हणालात तर वाद होणारच आहे. तिथे त्रिशुळ काय करतोय, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, सरकारला यावर तोडगा काढायला आहे. मुस्लिम समाजाकडून जी ऐतिहासिक जूक झाली आहे. ती सोडवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे आलं पाहीजे, असं देखील ते म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबचं वक्तव्य केलं आहे.

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा