राष्ट्रीय

ज्ञानवापीबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले, "ज्ञानवापीला मशीद म्हणाल तर..."

ज्ञानवापी मशीदीत त्रिशुळ काय करतोय, असा सवाल देखील योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

नवशक्ती Web Desk

देशभरात ज्ञानवापीवरुन वातावर तापताना दिसत आहे. यासाठी हिंदुत्ववादी गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. कनिष्ठ न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. असं असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे.

ज्ञानवापीला मशीद म्हणालात तर वाद होणार असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. ज्ञानवापीत अनेक देवतांच्या प्रतिमा आहेत. या प्रतिमा हिंदुंनी ठेवलेल्या नाहीत. जर ज्ञानवापीला मशीद म्हणालात तर वाद होणारच आहे. तिथे त्रिशुळ काय करतोय, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, सरकारला यावर तोडगा काढायला आहे. मुस्लिम समाजाकडून जी ऐतिहासिक जूक झाली आहे. ती सोडवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे आलं पाहीजे, असं देखील ते म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबचं वक्तव्य केलं आहे.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण