राष्ट्रीय

ज्ञानवापीबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले, "ज्ञानवापीला मशीद म्हणाल तर..."

ज्ञानवापी मशीदीत त्रिशुळ काय करतोय, असा सवाल देखील योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

नवशक्ती Web Desk

देशभरात ज्ञानवापीवरुन वातावर तापताना दिसत आहे. यासाठी हिंदुत्ववादी गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. कनिष्ठ न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. असं असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे.

ज्ञानवापीला मशीद म्हणालात तर वाद होणार असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. ज्ञानवापीत अनेक देवतांच्या प्रतिमा आहेत. या प्रतिमा हिंदुंनी ठेवलेल्या नाहीत. जर ज्ञानवापीला मशीद म्हणालात तर वाद होणारच आहे. तिथे त्रिशुळ काय करतोय, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, सरकारला यावर तोडगा काढायला आहे. मुस्लिम समाजाकडून जी ऐतिहासिक जूक झाली आहे. ती सोडवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे आलं पाहीजे, असं देखील ते म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबचं वक्तव्य केलं आहे.

Mumbai : सीएसएमटी येथील फलाट विस्तारासाठी दहा दिवसांचा ब्लॉक; अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर व ठाणे येथेच संपणार

Mumbai : कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील सक्तीच्या कारवाईला स्थगिती; हायकोर्टाने BMC ला फटकारले

साताऱ्यातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक; मुंबईतील २१ जणांच्या टोळीला अटक

Mumbai : सेवानिवृत्त अधिकारीच मागच्या दाराने सल्लागार म्हणून येतात; स्थायी समितीत गणेश खणकर यांचा आरोप

चार संरक्षण कॉरिडॉर उभारण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांची माहिती