नवी मुंबई

बँक ऑफ महाराष्ट्रच्या चिरनेर शाखेत पैशाचा तुटवडा; खातेदारांमध्ये नाराजीचा सूर

Swapnil S

उरण : बँक ऑफ महाराष्ट्रच्या चिरनेर शाखेतून खातेदारांना गरजेच्या वेळी पैसेच मिळत नाही. त्यामुळे खातेदारांना बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे हात हलवत घरी परतावे लागत असल्याने खातेदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

चिरनेर पंचक्रोशीतील हजारो गरीब गरजू खातेदार रहिवाशांनी आपापली पुंजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जमा केली आहे. परंतु बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे खातेदारांना वेळेवर स्वतःचे पैसेच मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक खातेदारांना बँकेतून हात हालवित घरी परतावे लागत असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र शाखेबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.

यासंदर्भात बँक ऑफ महाराष्ट्र चिरनेर शाखेकडे विचारणा केली असता बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापनाने उर्मटपणे नाव न सांगता सांगितले की सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्याने बँकेत वेळेवर पैसे येत नाहीत. त्यामुळे आम्ही खातेदारांना बँकेतून पैसे देऊ शकत नाहीत.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग