नवी मुंबई

उरणमध्ये बांध फुटून दोघा मुलांचा मृत्यू

खाडी किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती फुटल्याने चिखलात मुले रुतली गेल्याची दुदैवी घटना घडली.

Swapnil S

उरण : तालुक्यातील वेश्वी आदिवासी वाडीवरील मुले दिघोडे- धुतूम खाडी किनाऱ्यावर मच्छी पकडण्यासाठी गेली असता, किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती फुटल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडी वरील मुले ही नेहमी प्रमाणे मासेमारी करण्यासाठी दिघोडे - धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावर सोमवारी (दि२६) सायंकाळी ठिक ५ च्या सुमारास गेली होती; मात्र खाडी किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती फुटल्याने चिखलात मुले रुतली गेल्याची दुदैवी घटना घडली. यात दोन मुले दगावल्याची माहिती मिळत असून, उरण पोलिसांनी तसेच वेश्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील तांबोळी, धुतूम ग्रामपंचायतीचे सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन आदिवासी मुलांचे जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती