नवी मुंबई

मोरा-भाऊचा धक्का लाँच बंद राहणार

उरणची जीवनवाहिनी बनलेली लाँच सेवा सागरी मार्गातील गाळ काढण्याच्या कामासाठी दररोज दोन ते तीन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मोरा बंदरालगतचा गाळ काढण्याचे काम सहा दिवस होणार आहे.

Swapnil S

उरण : उरणची जीवनवाहिनी बनलेली लाँच सेवा सागरी मार्गातील गाळ काढण्याच्या कामासाठी दररोज दोन ते तीन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मोरा बंदरालगतचा गाळ काढण्याचे काम सहा दिवस होणार आहे.

उरण ते मुंबई दरम्यान सुरू असलेली लाँचसेवा ही उरणच्या रहिवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. परंतु, समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे या मार्गावरील मोरा बंदरालगत सातत्याने गाळ जमा होतो. परिणामी लाँच वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे, ओहोटीच्या वेळेस लाँचसेवा तीन ते चार तास बंद ठेवावी लागते.

२९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान मोरा जेट्टीलगतचा गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे. या दिवसांत दुपारी सुमारे दोन ते तीन तास लाँचसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या लोकलसेवेमुळे लाँचने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया