नवी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वर्षअखेरपर्यंत कार्यरत - ज्योतिरादित्य

गेल्या ६० वर्षांपासून देश मुंबर्इ आणि नवी मुंबर्इ जोडलेले पाहू इच्छित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबर्इ ट्रान्स हार्बर लिंक पुलाचे अनावरण करुन आज हे स्वप्न पूर्ण केले

Swapnil S

नागपूर : नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी मुंबर्इतील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू वर्षअखेरीस कार्यरत होर्इल, अशी घोषणा केली आहे. तसेच पुढील १० ते १५ वर्षात देशातील आणखी दहा शहारांत प्रत्येकी दोन विमानतळ असतील, अशी माहिती देखील दिली आहे. नागपूर येथे मिहान सेझ मधील एएआर-इंडामेर एमआरओ या विमान दुरुस्ती सुविधेच्या अनावरण समारंभात ज्योतिरादित्य सिंधिया बोलत होते.

गेल्या ६० वर्षांपासून देश मुंबर्इ आणि नवी मुंबर्इ जोडलेले पाहू इच्छित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबर्इ ट्रान्स हार्बर लिंक पुलाचे अनावरण करुन आज हे स्वप्न पूर्ण केले आहे, असेही सिंधिया यांनी यावेळी अधोरेखित केले. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान नवी मुंबर्इ आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होर्इल. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात या विमानतळावर पहिले विमान उतरेल. विमानतळामुळे नवी मुंबर्इचा मोठ्या प्रमाणात विकास होर्इल. तसेच पुढील १० ते १५ वर्षांत देशातील किमान दहा शहरात प्रत्येकी दोन विमानतळ असतील. कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबर्इतील विमानतळांची आपण पाहणी करणार आहोत, असेही सिंधिया यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार