नवी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वर्षअखेरपर्यंत कार्यरत - ज्योतिरादित्य

गेल्या ६० वर्षांपासून देश मुंबर्इ आणि नवी मुंबर्इ जोडलेले पाहू इच्छित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबर्इ ट्रान्स हार्बर लिंक पुलाचे अनावरण करुन आज हे स्वप्न पूर्ण केले

Swapnil S

नागपूर : नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी मुंबर्इतील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू वर्षअखेरीस कार्यरत होर्इल, अशी घोषणा केली आहे. तसेच पुढील १० ते १५ वर्षात देशातील आणखी दहा शहारांत प्रत्येकी दोन विमानतळ असतील, अशी माहिती देखील दिली आहे. नागपूर येथे मिहान सेझ मधील एएआर-इंडामेर एमआरओ या विमान दुरुस्ती सुविधेच्या अनावरण समारंभात ज्योतिरादित्य सिंधिया बोलत होते.

गेल्या ६० वर्षांपासून देश मुंबर्इ आणि नवी मुंबर्इ जोडलेले पाहू इच्छित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबर्इ ट्रान्स हार्बर लिंक पुलाचे अनावरण करुन आज हे स्वप्न पूर्ण केले आहे, असेही सिंधिया यांनी यावेळी अधोरेखित केले. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान नवी मुंबर्इ आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होर्इल. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात या विमानतळावर पहिले विमान उतरेल. विमानतळामुळे नवी मुंबर्इचा मोठ्या प्रमाणात विकास होर्इल. तसेच पुढील १० ते १५ वर्षांत देशातील किमान दहा शहरात प्रत्येकी दोन विमानतळ असतील. कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबर्इतील विमानतळांची आपण पाहणी करणार आहोत, असेही सिंधिया यांनी यावेळी सांगितले.

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

विमान तिकिटे महागणार! Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही इंधन अधिभार; वाचा सविस्तर

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

पुण्यात धक्कादायक घटना; लिफ्टच्या दरवाज्यात अडकला चिमुकलीचा हात, CCTV व्हिडिओ व्हायरल