नवी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वर्षअखेरपर्यंत कार्यरत - ज्योतिरादित्य

गेल्या ६० वर्षांपासून देश मुंबर्इ आणि नवी मुंबर्इ जोडलेले पाहू इच्छित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबर्इ ट्रान्स हार्बर लिंक पुलाचे अनावरण करुन आज हे स्वप्न पूर्ण केले

Swapnil S

नागपूर : नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवी मुंबर्इतील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू वर्षअखेरीस कार्यरत होर्इल, अशी घोषणा केली आहे. तसेच पुढील १० ते १५ वर्षात देशातील आणखी दहा शहारांत प्रत्येकी दोन विमानतळ असतील, अशी माहिती देखील दिली आहे. नागपूर येथे मिहान सेझ मधील एएआर-इंडामेर एमआरओ या विमान दुरुस्ती सुविधेच्या अनावरण समारंभात ज्योतिरादित्य सिंधिया बोलत होते.

गेल्या ६० वर्षांपासून देश मुंबर्इ आणि नवी मुंबर्इ जोडलेले पाहू इच्छित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबर्इ ट्रान्स हार्बर लिंक पुलाचे अनावरण करुन आज हे स्वप्न पूर्ण केले आहे, असेही सिंधिया यांनी यावेळी अधोरेखित केले. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान नवी मुंबर्इ आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होर्इल. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात या विमानतळावर पहिले विमान उतरेल. विमानतळामुळे नवी मुंबर्इचा मोठ्या प्रमाणात विकास होर्इल. तसेच पुढील १० ते १५ वर्षांत देशातील किमान दहा शहरात प्रत्येकी दोन विमानतळ असतील. कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबर्इतील विमानतळांची आपण पाहणी करणार आहोत, असेही सिंधिया यांनी यावेळी सांगितले.

Mumbai : मध्य रेल्वेवर आज रात्री ११.१६ ची शेवटची लोकल

Mumbai : गोरेगाव-ओशिवरा प्रवास होणार जलद; बहुप्रतिक्षित मृणालताई गोरे उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला, महापौर रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

सावधान! वर्तमानपत्रात पॅक केलेले समोसे-भजी खाताय? FSSAI कडून आरोग्याबाबत धोक्याचा इशारा

Mumbai : निसर्गप्रेमींसाठी पर्वणी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जंगल सफरीची संधी; कधी आणि कसं जायचं? वाचा सविस्तर

एकतर्फी प्रेमाचा हैवानपणा! १७ वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीचे वार, गळ्यात फास बांधून छतावर लटकवण्याचा प्रयत्न, VIDEO