राजकीय

ईव्हीएम मोबाईलला कनेक्ट होतच नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी ईव्हीएम हे स्वतंत्र यंत्र असून त्याला कोणतीही मोबाईल कनेक्टिव्हीटी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा केवळ ४८ मतांनी विजय झाला आहे. ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला आहे. त्यावरून आता जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ईव्हीएम मोबाईलवर आलेल्या ओटीपीने अनलॉक करण्यात येते, असेही या दरम्यान सांगण्यात आले आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी ईव्हीएम हे स्वतंत्र यंत्र असून त्याला कोणतीही मोबाईल कनेक्टिव्हीटी नसल्याचे स्पष्ट केले आहे. ईव्हीएम हॅक करता येत नाही. ईव्हीएम प्रोग्रॅमेबल नसून ईव्हीएमचा ओटीपी नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तर-पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी झाले. ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला. त्यानंतर आता दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकारपरिषद घेऊन याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली.

रवींद्र वायकर यांच्या नातलगाने मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर केल्याचा आरोप होत आहे. त्यावर, मुंबई सांगण्यात आले. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर मोबाईल घेऊन जाणे या दोघांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वायकर यांच्यासह त्यांच्या नातेवाईक आणि निवडणूक अधिकाऱ्यांविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध १८८, ३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मतदान केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजची तपासणी सुरू असून लवकरच पोलीस त्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन