राजकीय

"सौ सोनार की, एक लोहार की", सर्वोच्च नायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी वेळकाढूपणा केल्याचा अप्रत्यक्ष ठपका ठेवत पोरखेळ लावलाय का? अशा कडक शब्दात कोर्टाने नार्वेकरांना सुनावलं.

नवशक्ती Web Desk

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ७२ तासात हे सरकार जाणार. ७२ सात मी आधीही बोललो होतो. आता वेळ आली आहे, असं म्हणत ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वेळकाढूपणा केल्याचा अप्रत्यक्ष ठपका सुप्रीम कोर्टाने ठेवला असून पोरखेळ लावलाय का? अशा कडक शब्दात कोर्टाने नार्वेकरांना सुनावलं.

विधानसभा अध्यक्षांनी ICU मध्ये टाकून सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांनाचा ICU मध्ये जाणयाची वेळ आली आहे. सौ सोनार की एक लोहार की असं आजच्या न्यायालयाचं मत आहरे. हातोडा मारला आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?

विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाला मान्य नसल्याचीही न्यायालयाने यावेळी म्हटलं. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, तुम्ही आदेशाची पायमल्ली करत आहात. सुधारीत वेळापत्रक मंगळवारपर्यंत देण्यात यावं. विधासभा अध्यक्षांनी दिलेलं वेळापत्रक अमान्यकरत न्यायालयाने त्यांना नवीन वेळापत्रत देण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सोमवारपर्यंत वेळापत्रक सादर करावं. अन्यथा आम्ही आदेश देऊ असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष पद हे घटनात्मक जरी असलं तरी आम्ही आदेश देऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही. मंगळवारी(१७

ऑक्टोबर) नवं वेळापत्रक सादर करावं. जर निश्चित वेळेत अध्यक्षांकडून येऊ शकलं नाही. तर मात्र नाईलाजास्तव सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट टाईमलाईन आखून द्यावी लागले. दोन महिन्यांची टाईमलाईन असून शकते. ज्यात अध्यक्षांना निर्णय घेणं बंधनकारक असणार आहे.

पुढच्या निवडणुकीच्या आधी निर्णय न घेतल्यास विधासभा अध्यक्षांसमोरील कारवाई निरर्थक ठरेल, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे ५५ टक्के काम पूर्ण; ७६.४८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे जानेवारी २०२७ पर्यंत लोकार्पण होण्याची शक्यता

Mumbai : वांद्रेतील मेट्रो २बीच्या बांधकामस्थळी आग; जळते अवशेष रस्त्यावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल, MMRDA चे स्पष्टीकरण

एकनाथ शिंदेंचे नाव वगळल्याने महायुतीत संघर्ष; शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे वाद

मराठी चित्रपटसृष्टीच्या शतकपूर्तीला उजाळा; नॅशनल गॅलरीत दुर्मिळ छायाचित्रे, आठवणींचा खजिना; ३१ जुलैपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले

एसटी भाडेवाढीला मुदतवाढ; महामंडळाची १० टक्के भाडेवाढ १५ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम