क्रीडा

भारत-पाकिस्तान सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री पूर्ण

वृत्तसंस्था

भारत-पाकिस्तान यांच्यात मेलबर्न येथे २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर-१२ सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री झाली आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी जाहीर केले.

काही आठवड्यांपूर्वीच आयसीसीने स्टेडियममध्ये उभे राहून सामना पाहण्यासाठीही तिकिटांची सुविधा उपलब्ध केली होती. त्या चार हजार तिकिटांसह आसनक्षमतेची एकूण ५४ हजार तिकिटांची विक्री झाली आहे. नुकताच झालेल्या आशिया चषकात भारत-पाकिस्तान या दोघांनीही एकमेकांना प्रत्येकी एकदा हरवले होते. तसेच गतवर्षी यूएईमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताला धूळ चारली होती. आता पुन्हा एकाच गटात हे संघ आल्यामुळे यावेळी भारत पाकिस्तानला नमवून अभियानाचा विजयारंभ करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या सामन्यासाठीही प्रेक्षकांनी अतिरिक्त तिकिटांची मागणी केली असल्याचे समजते.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार