कसोटीसाठी भारताकडे दर्जेदार ऑफस्पिनर नाही; हरभजन सिंगचे मत 
क्रीडा

कसोटीसाठी भारताकडे दर्जेदार ऑफस्पिनर नाही; हरभजन सिंगचे मत

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने भारताची कमतरता दाखवून दिली. कसोटी क्रिकेटसाठी भारताकडे त्या दर्जाचा ऑफस्पिनर नसल्याचे मत हरभजनने व्यक्त केले. तसेच वॉशिंग्टन सुंदरवर आणखी जबाबदारी टाकण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.

Swapnil S

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने भारताची कमतरता दाखवून दिली. कसोटी क्रिकेटसाठी भारताकडे त्या दर्जाचा ऑफस्पिनर नसल्याचे मत हरभजनने व्यक्त केले. तसेच वॉशिंग्टन सुंदरवर आणखी जबाबदारी टाकण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.

रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर प्रथमच घरच्या मैदानावर सेना देशाविरुद्धच्या मालिकेत भारतीय फिरकीपटू अपयशी ठरले. दोन कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी एकूण २५ बळी घेत भारताला अडचणीत टाकले. भारताकडे कसोटी क्रिकेटसाठी दर्जेदार ऑफ स्पिनर नाही, असे हरभजन म्हणाला.

हरभजनच्या मते, तमिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला ऑफस्पिनर म्हणून स्वतःला सिद्ध करण्यास अजून वेळ लागेल. तो अद्याप अश्विनसारखा पर्याय बनलेला नाही.

मला वाटते की वॉशिंग्टन सुंदरमध्ये क्षमता आहे, पण त्याला अधिक गोलंदाजी करायला लावली पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३० ते ३५ षटके टाकायला हवीत. तेव्हाच तो मोठा गोलंदाज बनेल, असे हरभजन म्हणाला.

आपण ज्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळतो, त्यावर चेंडू फिरतात किंवा सरळ जातात. त्यामुळे अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणे सोपे असते. जेव्हा चांगल्या विकेटवर एखादा गोलंदाज बळी घेतो, तेव्हा तो मोठा गोलंदाज मानला जातो, असे हरभजन म्हणाला.

महावितरण कंपनीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब; शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी महावितरणचा IPO येणार

आता राज्यभरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास चार वर्षांचा होणार; विद्यापीठांमध्ये २०२६-२७ पासून 'ऑनर्स' आणि 'संशोधन' पदवीचे नवे पर्याय उपलब्ध

Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

उरण : आदिवासी वाड्यांची पाण्यासाठी वणवण; रानसई-पुनाडे धरणात अवघा ४७% साठा

आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार