क्रीडा

तिसऱ्या कसोटी सामन्यात 'या' खेळाडूने केले न्यूझीलंडला नेस्तनाबूत

भारताने दिलेल्या ४१६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड-अ संघाचा दुसरा डाव ८५.२ षट्कांत ३०२ धावांत संपुष्टात आला.

वृत्तसंस्था

डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमारने (५/१०३) केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारत-अ संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड-अ संघाला ११३ धावांनी नेस्तनाबूत केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका १-० अशा फरकाने जिंकली. उभय संघांतील पहिल्या दोन लढती अनिर्णीत राहिल्या होत्या.

भारताने दिलेल्या ४१६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड-अ संघाचा दुसरा डाव ८५.२ षट्कांत ३०२ धावांत संपुष्टात आला. जो कार्टरने १११ धावांची झुंजार शतकी खेळी साकारली. डॅन क्लीव्हर (४४) आणि मार्क चॅपमन (४५) यांनीही कडवा प्रतिकार केला; मात्र सौरभने पाच बळी मिळवून न्यूझीलंडला रोखले. सर्फराज खानने दोन, तर शार्दूल ठाकूर, मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद करून सौरभला उत्तम साथ दिली. उभय संघांतील एकदिवसीय मालिकेला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

भारत-पाकिस्तान सामना : ''देशभक्तीचा व्यापार सुरू''; उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

"BCCI च्या कुटुंबाचं कोणी मेलं नाही"; भारत-पाक सामन्यावर भडकली पहलगाम हल्ल्यातील पिडीतेची पत्नी; क्रिकेटर, स्पॉन्सर्सना घेतलं धारेवर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क