क्रीडा

IND vs PAK, ICC World Cup 2023 : अहमदाबादच्या रणभूमीत आज भारत-पाकिस्तान आमनेसामने

नवशक्ती Web Desk

अहमदाबाद : वर्षाचे महिने, महिन्यातील आठवडे, आठवड्यातील दिवस, दिवसातील तास, तासातील मिनिटे आणि मिनिटाचे सेकंद उलटले; तरी गेल्या ७६ वर्षांपासून भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतीचे औत्सुक्य टिकून आहे. गेल्या काही वर्षांत राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे उभय संघांतील सामन्यांची संख्या रोडावली आहे. मात्र शनिवारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. पावसाचा या लढतीवर प्रभाव राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकदिवसीय विश्वचषकात भारताने पाकिस्तानवर नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. १९९२ ते २०१९ पर्यंतच्या सात विश्वचषकात भारताने त्यांच्यावर विजय मिळवला आहे. आता या पारंपरिक द्वंद्वातील आठव्या अंकातही बाजी मारून रोहित शर्माचे भारतीय शिलेदार यंदाच्या विश्वचषकातील सलग तिसरा सामना जिंकतील, असे अपेक्षित आहे. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून सरशी साधली, तर दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानचा ८ गडी राखून धुव्वा उडवला.

दुसरीकडे बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघानेही सलग दोन विजयांची नोंद करून स्पर्धेची धडाक्यात सुरुवात केली आहे. त्यांनी सर्वप्रथम नेदरलँड्सला नेस्तनाबूत केले. मग श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत विश्वविक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना दमदार विजय नोंदवला. भारताची फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानची गोलंदाजी यांच्यातील द्वंद्वाकडे चाहते लक्ष ठेवून असून या लढतीसाठी असंख्य तारांकित मंडळीही उपस्थित राहणार आहेत.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग