क्रीडा

भारताच्या कर्णधाराने भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला

बुमराहने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत.

वृत्तसंस्था

गतवर्षाच्या इंग्लंड दौऱ्यात स्थगित झालेल्या पाचव्या पुनर्नियोजित कसोटीत सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन विकेट घेताच भारताचा काळजीवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहने भुवनेश्वर कुमारने २०१४ मध्ये केलेला विक्रम मोडला.

बुमराहने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी भुवनेश्वरने २०१४ मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १९ विकेट‌्स घेतल्या होत्या. रोहितच्या अनुपस्थितीत संघाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला हा विक्रम आणखी पुढे नेण्यास मोठा वाव आहे. भारताकडून इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या पाच जणांच्या यादीत फक्त एका फिरकीपटूचा समावेश आहे. लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांनी १९५९ मधील दौऱ्यात पाच सामन्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी ३४.६४ च्या सरासरीने या विकेट्द घेतल्या होत्या, तर २.९४ प्रती षटके सरासरीने धावा दिल्या होत्या.

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन

बराक ओबामांच्या Favourite Songs 2025 यादीत मराठमोळे ‘पसायदान’; जयंत पाटील म्हणाले, "आध्यात्मिक विचार जागतिक पातळीवर...

"हा अवॉर्ड आईसाठी!" जीवनातला पहिला-वहिला पुरस्कार स्वीकारताना आर्यन खानची प्रतिक्रिया; गौरी खाननेही खास पोस्ट करत केले कौतुक

दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई