क्रीडा

भारताच्या कर्णधाराने भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला

बुमराहने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत.

वृत्तसंस्था

गतवर्षाच्या इंग्लंड दौऱ्यात स्थगित झालेल्या पाचव्या पुनर्नियोजित कसोटीत सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन विकेट घेताच भारताचा काळजीवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहने भुवनेश्वर कुमारने २०१४ मध्ये केलेला विक्रम मोडला.

बुमराहने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी भुवनेश्वरने २०१४ मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १९ विकेट‌्स घेतल्या होत्या. रोहितच्या अनुपस्थितीत संघाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला हा विक्रम आणखी पुढे नेण्यास मोठा वाव आहे. भारताकडून इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या पाच जणांच्या यादीत फक्त एका फिरकीपटूचा समावेश आहे. लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांनी १९५९ मधील दौऱ्यात पाच सामन्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी ३४.६४ च्या सरासरीने या विकेट्द घेतल्या होत्या, तर २.९४ प्रती षटके सरासरीने धावा दिल्या होत्या.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत