क्रीडा

भारताच्या कर्णधाराने भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला

बुमराहने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत.

वृत्तसंस्था

गतवर्षाच्या इंग्लंड दौऱ्यात स्थगित झालेल्या पाचव्या पुनर्नियोजित कसोटीत सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन विकेट घेताच भारताचा काळजीवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहने भुवनेश्वर कुमारने २०१४ मध्ये केलेला विक्रम मोडला.

बुमराहने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी भुवनेश्वरने २०१४ मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १९ विकेट‌्स घेतल्या होत्या. रोहितच्या अनुपस्थितीत संघाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला हा विक्रम आणखी पुढे नेण्यास मोठा वाव आहे. भारताकडून इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या पाच जणांच्या यादीत फक्त एका फिरकीपटूचा समावेश आहे. लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांनी १९५९ मधील दौऱ्यात पाच सामन्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी ३४.६४ च्या सरासरीने या विकेट्द घेतल्या होत्या, तर २.९४ प्रती षटके सरासरीने धावा दिल्या होत्या.

इराणचा UAE च्या दोन जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, आठ जण जखमी

Mumbai : मॅनहोल सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड'; लुकलुकणारे दिवे मॅनहोल दुरुस्तीवेळी महत्त्वपूर्ण ठरणार

फडणवीसांनी मोडला पवारांचा विक्रम; सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी

मेट्रो-५ मार्गिकेच्या कामाला वेग; उल्हासनगर मेट्रो विस्तार ४८ महिन्यांत होणार पूर्ण

आता 'एक रुग्ण, एक नातेवाईक'; रुग्णालयातील ताण आणि वादविवाद टाळणार; अभ्यागत प्रवेशिका प्रणालीकडे महापौरांनी वेधले लक्ष