क्रीडा

भारताच्या कर्णधाराने भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला

बुमराहने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत.

वृत्तसंस्था

गतवर्षाच्या इंग्लंड दौऱ्यात स्थगित झालेल्या पाचव्या पुनर्नियोजित कसोटीत सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन विकेट घेताच भारताचा काळजीवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहने भुवनेश्वर कुमारने २०१४ मध्ये केलेला विक्रम मोडला.

बुमराहने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी भुवनेश्वरने २०१४ मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १९ विकेट‌्स घेतल्या होत्या. रोहितच्या अनुपस्थितीत संघाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला हा विक्रम आणखी पुढे नेण्यास मोठा वाव आहे. भारताकडून इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या पाच जणांच्या यादीत फक्त एका फिरकीपटूचा समावेश आहे. लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांनी १९५९ मधील दौऱ्यात पाच सामन्यात १७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी ३४.६४ च्या सरासरीने या विकेट्द घेतल्या होत्या, तर २.९४ प्रती षटके सरासरीने धावा दिल्या होत्या.

Mumbai : थकीत मेंटेनन्सच्या पैशांची वसुली अनेक वर्षांनंतरही केली जाऊ शकते! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Mumbai : ७९ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; BMC तील निवडणूक याचिका न्यायप्रविष्ट, माहिती अधिकारातून उघड

कर्नाटकात दोन हत्ती भिडले अन् क्षणात होत्याचं नव्हतं; पती-लेकीसमोरच महिलेचा चिरडून मृत्यू, हत्तींची अंघोळ पाहताना काळाचा घाला - Video

शिंदे सेना-भाजपमध्ये ठाण्यात संघर्ष पेटला; पक्षीय वाद नसल्याचा शिंदे सेनेचा दावा

Mumbai : समुद्रातील तरंगता कचरा काढणार इलेक्ट्रिक बोट; गेटवे ऑफ इंडिया व बधवार पार्क येथे मानवरहित बोट कार्यरत