एक्स @himantabiswa
क्रीडा

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सात्विक-चिराग उपांत्य फेरीत; सिंधू मात्र पराभूत

भारताच्या सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीने शुक्रवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताच्या सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीने शुक्रवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. मात्र महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू, तर पुरुष एकेरीत किरण जॉर्ज यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

७५० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक-चिरागने कोरियाच्या जीन याँग आणि कँग मिन यांना २१-१०, २१-१७ अशी सरळ दोन गेममध्ये ४१ मिनिटांत धूळ चारली. त्यांची शनिवारी मलेशियाची तिसरी मानांकित जोडी फेई गोह आणि नूर इझुद्दीन यांच्याशी गाठ पडेल.

महिला एकेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्काने सिंधूला २१-९, १९-२१, २१-१७ असे पराभूत केले. तसेच पुरुष एकेरीत चीनच्या हाँग वेंगने किरणला २१-१३, २१-१९ असे नेस्तनाबूत केले. त्यामुळे भारताचे येथील अभियान संपले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा