एक्स @himantabiswa
क्रीडा

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सात्विक-चिराग उपांत्य फेरीत; सिंधू मात्र पराभूत

भारताच्या सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीने शुक्रवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताच्या सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीने शुक्रवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. मात्र महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू, तर पुरुष एकेरीत किरण जॉर्ज यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

७५० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक-चिरागने कोरियाच्या जीन याँग आणि कँग मिन यांना २१-१०, २१-१७ अशी सरळ दोन गेममध्ये ४१ मिनिटांत धूळ चारली. त्यांची शनिवारी मलेशियाची तिसरी मानांकित जोडी फेई गोह आणि नूर इझुद्दीन यांच्याशी गाठ पडेल.

महिला एकेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्काने सिंधूला २१-९, १९-२१, २१-१७ असे पराभूत केले. तसेच पुरुष एकेरीत चीनच्या हाँग वेंगने किरणला २१-१३, २१-१९ असे नेस्तनाबूत केले. त्यामुळे भारताचे येथील अभियान संपले.

सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट; रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?

आता ‘वर्षा’वरही CCTV यंत्रणा; राज्यातील पहिलेच शासकीय निवासस्थान

मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर; नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणे भोवले

परदेशी विमानसेवेत एअर इंडियाची कपात; दिल्ली-शिकागोसह ६ प्रमुख आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सेवा तात्पुरती स्थगित