क्रीडा

T20 World Cup 2022 : भारताचा नेदरलँडवर सहज विजय, गुणतालिकेत अव्वल स्थान

वृत्तसंस्था

भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना आज सिडनी क्रिकेट मैदानावर पार पडला. उत्तम फलंदाजी आणि नंतर भक्कम गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना 56 धावांनी जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करत 179 धावा केल्या. यानंतर नेदरलँड्सच्या संघाला १२३ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले, त्यामुळे भारताने ५६ धावांनी सामना जिंकला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली.  गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून नेदरलँडला अधिक धावा करू दिल्या नाहीत. या विजयासह भारताने गट 2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल