Photo : X (Neeraj Chopra)
क्रीडा

यंदा जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताची पाटी कोरीच

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत यंदा भारताची पाटी कोरीच राहिली. तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत भारताच्या अन्य खेळाडूंनीही निराशा केली. त्यामुळे भारताला पदकाविनाच मायदेशी परतावे लागले.

Swapnil S

टोकियो : जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत यंदा भारताची पाटी कोरीच राहिली. तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत भारताच्या अन्य खेळाडूंनीही निराशा केली. त्यामुळे भारताला पदकाविनाच मायदेशी परतावे लागले.

यंदा १३ ते २१ सप्टेंबर या कालावधीत टोकियो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताचे १९ खेळाडू सहभागी झाले होते. दर दोन वर्षांनी जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा जागतिक स्पर्धेचे २०वे पर्व होते. २०२३मध्ये हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताने एकमेव सुवर्णदपदकासह १८वा क्रमांक मिळवला होता. नीरजनेच भारतासाठी ते सुवर्ण जिंकले होते. यंदा भालाफेकीच्या अंतिम फेरीकडे नीरज विरुद्ध पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम यांच्यातील जुगलबंदी म्हणून पाहिले जात होते. मात्र नीरजला चक्क आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्या तुलनेत सचिन यादवने चौथे स्थान मिळवून भविष्यातील आशा निर्माण केल्या.

अन्य क्रीडा प्रकारांत भारताचा उंच उडीपटू सर्वेश कुशारेने अंतिम फेरी गाठली, मात्र तोही पदकापासून वंचित राहिला. भालाफेकपटू अन्नू राणी, धावपटू गुलवीर सिंग, लांब उडीपटू मुरली श्रीशंकर यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. त्यामुळे २०१९ येथील दोहा जागतिक स्पर्धेनंतर भारताला पुन्हा एकदा एकही पदक जिंकता आले नाही. यापूर्वी, २०२२मध्ये भारताने रौप्य, तर २०२३मध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी मात्र भारताच्या पदरी निराशा पडली.

Mumbai : गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही; मृताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

मुंबईकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी अंधेरी, BKC, धारावीसारख्या महत्त्वाच्या भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; जपून पाणी वापरा - BMC

आंबा, काजू, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यातील महानगरपालिकांच्या मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल; आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत होणार लागू?

लाडक्या बहिणींची ओवाळणी लाटणाऱ्या भावांना दणका; राज्य सरकार पैसे परत घेणार; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा