India vs England Test Series Social Media
क्रीडा

'ध्रुव' ताऱ्यासारखा चमकला जुरेल! भारताने इंग्लंडला चारली धूळ; चौथ्या कसोटीसह मालिकाही 3-1 ने खिशात

विशेष म्हणजे युवा फलंदाज ध्रुव जुरेलने पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावांची अप्रतिम खेळी केली.

Naresh Shende

रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना रंगला. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने सलग तीन कसोटी सामन्यांवर विजय मिळवून मालिका खिशात घातली. फिरकी गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करून भारताला जबरदस्त विजय मिळवून दिला. कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिलने दुसऱ्या डावात केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताला इंग्लंडला पराभूत करणं शक्य झालं. विशेष म्हणजे युवा फलंदाज ध्रुव जुरेलने पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावांची अप्रतिम खेळी केली. या विजयामुळे टीम इंडियाने भारतीय खेळपट्टीवर सलग १७ वा मालिका विजय मिळवला. म्हणजेच २०१३ पासून भारतीय खेळपट्ट्यांवर टीम इंडियाने विजयाची मोहोर उमटवलीय.

दुसऱ्या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने धडाकेबाज सुरुवात करून भारताला ८४ धावांपर्यंत पोहोचवलं होतं. परंतु, रोहित (५५), यशस्वी जैस्वाल (३७) धावांवर बाद झाल्यानंतर रजत पाटिदार (०), रविंद्र जडेजा (४) आणि सर्फराज खान (०) स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर शुबमन गिल आणि ध्रुव जुरेलच्या सावध खेळीमुळं भारताला या सामन्यात विजय संपादन करता आलं. शुबमनने १२४ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या, तर ध्रुव जुरेल ७७ चेंडूत ३९ धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ३५३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने ७३ तर ध्रुव जुरेलने ९० धावांची खेळी साकारली होती. या धावांच्या जोरावर पहिल्या डावात भारताला सर्वबाद ३०७ धावांवर मजल मारता आली. त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची दुसऱ्या डावात दमछाक केली. इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी १४५ धावांवर गुंडाळलं. त्यामुळे इंग्लंडने भारताला विजयासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं होतं.

Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा विवाहबंधनात; अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर Photo व्हायरल

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल