एक्स @BCCIWomen
क्रीडा

भारतीय युवतींचा उपांत्य फेरीत प्रवेश; त्रिशाचे धडाकेबाज शतक, स्कॉटलंडवर वर्चस्व

मलेशिया येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने सलग चौथा विजय नोंदवताना थाटात उपांत्य फेरीत धडक मारली.

Swapnil S

नवी दिल्ली : मलेशिया येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने सलग चौथा विजय नोंदवताना थाटात उपांत्य फेरीत धडक मारली. सलामीवीर त्रिशा घोंगडीच्या ५९ चेंडूंतील नाबाद ११० धावांच्या शतकी खेळीमुळे भारतीय युवतींच्या संघाने स्कॉटलंडचा १५० धावांनी फडशा पाडला.

सुपर-सिक्स फेरीतील पहिल्या गटाच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत १ बाद २०८ धावांचा डोंगर उभारला. त्रिशाने स्पर्धेतील पहिले शतक झळकावण्याचा मान मिळवताना १३ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. त्रिशा आणि जी कामलिनी यांनी ८१ चेंडूंत १४७ धावांची सलामी नोंदवली. कामलिनीने ४२ चेंडूंत ५१ धावा केल्या. त्यानंतर सानिका चाळकेच्या साथीने त्रिशाने संघाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. सानिका २९ धावांवर नाबाद राहिली. मैसीने एकमेव बळी मिळवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत ५८ धावांतच गारद झाला. डावखुरी फिरकीपटू आयुषी शुक्लाने ४ बळी मिळवले. तिला लेगस्पिनर त्रिशाने ३ बळी घेत सुरेख साथ दिली. त्यामुळे भारताने आगेकूच केली.

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

'वंदे मातरम्' चर्चेतून राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; ‘वंदे मातरम्’वर भाजपचा दावा कशासाठी?

MPSC ची मोठी घोषणा : संयुक्त परीक्षांच्या तारखेत बदल; २१ डिसेंबरच्या मतमोजणीमुळे आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड