क्रीडा

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ ९० ते ९५ टक्के तयार - रोहित शर्मा

वृत्तसंस्था

भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ९० ते ९५ टक्के संघ तयार आहे; मात्र संघात काही किरकोळ बदल करायचे आहेत. भारतीय संघ जवळपास सज्ज झाला आहे, असे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

ऑक्टोबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक क्रकेट स्पर्धा नियोजित आहे. टी-२० विश्वचषकाच्या संघाबद्दल रोहित म्हणाला की, या संघात आणखी काही खेळाडूंना संधी दिली जाईल. आशिया चषक सुपर-४ फेरीत श्रीलंकेकडून पराभव झाल्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्ही आणखी काही खेळाडूंना संधी देणार आहोत. त्यानंतर टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर केला जाईल. सध्या जो संघ आहे तो टी-२० विश्वचषकासाठी ९५ टक्के निश्चित आहे.

त्याने निर्दशनास आणून दिले की, आम्ही फक्त दोनच सामने गमावले आहेत. गेल्या विश्वचषकापासून आम्ही जास्त सामने जिंकत आलो आहोत. या सामन्यांपासून आम्हाला बरेच काही शिकविले आहे. आम्ही अजूनही काही प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर