क्रीडा

भारताच्या 'या' जोडीला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपद

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ही दुसरी भारतीय जोडी ठरली.

वृत्तसंस्था

भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. उपांत्य फेरीत भारतीय जोडीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागेल.

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ही दुसरी भारतीय जोडी ठरली. यापूर्वी अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गुट्टा यांनी २०११मध्ये या स्पर्धेत पदक जिंकले होते. उपांत्य फेरीत मलेशियाच्या ऑरोन चिया आणि सोह वूई यिक जोडीने सात्विक-चिराग जोडीचा २०-२२, २१-१८, २१-१६ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय जोडीने शानदार कामगिरी करत पहिला गेम २२-२० अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र भारतीय जोडीचा १८-२१ असा पराभव झाला. भारतीय जोडीने शेवटचा आणि निर्णायक गेमही १६-२१ असा गमावला. उपांत्य फेरीतील या पराभवामुळे भारताच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा मावळल्या.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई