क्रीडा

भारताच्या 'या' जोडीला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपद

वृत्तसंस्था

भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. उपांत्य फेरीत भारतीय जोडीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागेल.

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ही दुसरी भारतीय जोडी ठरली. यापूर्वी अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गुट्टा यांनी २०११मध्ये या स्पर्धेत पदक जिंकले होते. उपांत्य फेरीत मलेशियाच्या ऑरोन चिया आणि सोह वूई यिक जोडीने सात्विक-चिराग जोडीचा २०-२२, २१-१८, २१-१६ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय जोडीने शानदार कामगिरी करत पहिला गेम २२-२० अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र भारतीय जोडीचा १८-२१ असा पराभव झाला. भारतीय जोडीने शेवटचा आणि निर्णायक गेमही १६-२१ असा गमावला. उपांत्य फेरीतील या पराभवामुळे भारताच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा मावळल्या.

अजब पालिकेचा गजब कारभार! CSMT स्थानकाजवळील भुयारी मार्गाची दुरुस्ती; नव्या लाद्या काढून पुन्हा नवीनच लाद्या बसवण्याचे काम

शिवसेना खरी कोणाची यावरील दक्षिण मुंबईचा कौल निर्णायक!

कोरोना लस देऊन देश सुरक्षित केला; नारायण राणे यांच्या प्रचार सभेत अमित शहा यांचे वक्तव्य

डबेवाला कामगार पुतळा हटवण्याच्या हालचाली : १ मे रोजी पुतळा झाकून ठेवल्याने अभिवादन करता आले नाही; डबेवाल्यांनी व्यक्त केली खंत

...अन्यथा चर्चगेट स्थानक जप्त करू; पश्चिम रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाचा दणका