IPL 2026 : कोलकाता पराभूत अन् साखळी फेरी समाप्त (PHOTO- X)
क्रीडा

IPL 2026 : कोलकाता पराभूत अन् साखळी फेरी समाप्त

अखेर ७० सामन्यांनंतर आयपीएलच्या १९व्या हंगामातील साखळी फेरी समाप्त झाली.

Swapnil S

कोलकाता : अखेर ७० सामन्यांनंतर आयपीएलच्या १९व्या हंगामातील साखळी फेरी समाप्त झाली. रविवारी दुपारी राजस्थानने मुंबईवर मात केल्यामुळे बाद फेरीतील चौथा संघ स्पष्ट झाला. त्यामुळे पंजाब व कोलकाताचेही आव्हान संपुष्टात आले. रविवारी रात्री मग दिल्लीने कोलकाताला धूळ चारून शेवट गोड केला. त्यामुळे राजस्थानच्या पराभवानंतरही कोलकाताला लाभ झाला नसता, हे स्पष्ट झाले. अशाप्रकारे जवळपास २ महिन्यांनी कोलकाताच्या पराभवासह आयपीएलची साखळी फेरी समाप्त झाली.

२८ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १९वा हंगाम सुरू झाला होता. पंजाबने अखेरच्या साखळी सामन्यात लखनऊला नमवून १५ गुणांपर्यंत मजल मारलेली. त्यामुळे राजस्थान मुंबईकडून पराभूत झाली असती, तर पंजाबने आगेकूच केली असती. मात्र राजस्थानने आठवा विजय नोंदवून १६ गुणांसह बाद फेरी गाठली.

पंजाबने सुरुवातीच्या सातपैकी सहा सामने जिंकले होते. कोलकाताविरुद्ध त्यांना पावसामुळे एका गुणावर समाधान मानावे लागले. हाच एक गुण त्यांना महागात पडला. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एखादा संघ सुरुवातीच्या सात सामन्यांत अपराजित राहूनही बाद फेरी गाठू शकला नाही. तसेच कोलकाताला १३ गुणांवर समाधान मानावे लागले. अखेरची लढत त्यांना मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे होते. मात्र ते पराभूत झाले.

Mumbai : चर भरण्याचा खर्च ६१८ कोटींवर; स्थायी समितीत वादळी चर्चा होण्याची शक्यता, रस्त्यांवरील चर बुजवा अन्यथा दुप्पट रक्कम भरा - BMC चा इशारा

नाशिक टीसीएस प्रकरण : मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर; SIT कडून प्रश्नांची सरबत्ती

अर्थमंत्र्यांचा ‘थ्री-एफ’चा मूलमंत्र; इंधन, खत, परकीय चलनावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

सायकल चालवल्याने मेंदूचे आरोग्य सुधारण्यास होते मदत; १९ देशांमध्ये केलेल्या अभ्यासानंतर सिद्ध

बांगलादेशींना रोखण्यासाठी बंगालमध्ये होल्डिंग सेंटर सुरू